Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले?”

प्रविण दरेकर यांचा राज्य सरकारला सवाल

July 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

कोरोनाची साथ नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला. अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी काय केले? असा घणाघाती सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज उपस्थित केला.

 

आज कृषि दिनानिमित्त दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून दरेकर म्हणाले. राज्यातील शेतकरी आज अनेक संकाटातून जात आहे. हजारो निराशावादी शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. राज्यात बी बियाणे उपलब्ध होत नसून खताची अडचण, हमीभाव दिला गेला नाही. एकंदरीत आजचा शेतकरी अडचणीत आहे. खतांची दरवाढ झाली त्यावळेस केंद्राने मदत केली असून दरवाढ कमी करण्यात आली. केंद्राकडून शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या गेल्या. परंतु राज्यात अजूनही आर्थिक दृष्ट्या शेतकरी अडचणीत आहे. अशा वेळेला आपण शेतकऱ्यांना काय दिले, काय प्रगती केली असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला?

 

राज्यांमध्ये कोणतेही पॅकेज का नाही?

पवार साहेब यांचे कृषि क्षेत्रात फार मोठे योगदान असल्याचे भुजबळ यांनी वक्तव्य केले यावर दरेकर म्हणाले, पवार साहेब कृषिमंत्री होते त्यांचे महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात मोठे योगदान आहे. योगदान विषयी आणि शेतकरी अडचणीत असल्यावरून जोड तोड करण्याची आवश्यकता नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला. कोरोना संकट काळात केंद्राकडून सर्व सामान्य लोकांना पॅकेज देण्यात आले, मदतीचा हात पुढे करण्यात आला. शेतकरी, मजूर, कामगार, बेरोजगार किंबहुना छोटे घटक किंवा छोटे व्यावसायिक यांना केंद्राकडून मदत करण्यात आली. अनेक राज्याने आपली पॅकेज केंद्राला अनुसरून जाहीर केली असून, त्यामध्ये कर्नाटक, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्य आहे. परंतु तरीही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी का कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आले नाही असा सवाल दरेकर यांनी विचारला.

 

आलं अंगावर ढकला केंद्रांवर

केंद्राने ६ लाख २८ हजार कोटीचं पॅकेज जाहीर करत उद्योगजगताला दिलासा देण्याचं काम केलं आहे. वेगवेगळ्या व्यवसायांसाठी, छोट्या उद्योगजतासाठी हे पॅकेज निश्चितपणे दिलासा देईल. पर्यटन उद्योगासाठी १० लाख विनातारण कर्ज दिलं. कोरोना संकट काळात अनेक छोटे पर्यटन उद्योग अडचणीत सापडले आहेत, छोटे उद्योगांना २ टक्के व्याजदार आणि सव्वा लाख कर्ज केंद्र सरकार देणार आहे. छोटे उद्योगधंदे टिकावे, बेरोजगारी कमी व्हावी. पुनः अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी हीच या मागची भावना आहे. महाराष्ट्र उद्योगशील राज्य आहे. उद्योगांसाठी काय केलं, बेरोजगरांसाठी काय केलं, त्यांच घर कशाप्रमाणे चालतय हे राज्यसरकार पाहत नाही. त्यामुळे आपला नाकर्तेपणा लपवत आलं अंगावर ढकला केंद्रांवर अशी भूमिका राज्यसरकार घेत आहे.

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, तपास करावा

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणं दुर्दैवी आहे. नेते जर आपल्या भूमिका मांडत असतील तर ते योग्य आणि अयोग्य हे देशातील लोकं ठरवतील. पण शेकडोच्या संख्येने अनेक गरीब, उपेक्षित समाज आहे. त्यांना संघटित करत त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आज बहुजन समाजातील नेता पुढे येत महाराष्ट्रभर फिरत आहे. पण त्यांची अडवणूक कोण करत आहे, याचा सुद्धा तपास करावा अशी मागणी दरेकर यांनी केली.


Tags: BJPchhagan bhujbalncp president sharad pawarpravin darekarकृषि दिनगोपीचंद पडळकरदेवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडी सरकारविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Previous Post

कंगनाच्या पासपोर्टचं नुतनीकरण, शुटिंगसाठी परदेशात जाणार!

Next Post

देशात १२ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी ‘मेड इन इंडिया’ लस

Next Post
zydus

देशात १२ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी ‘मेड इन इंडिया’ लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!