Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सर्वोच्च न्यायालयाचे ‘राज्यपाल – राज्य सरकार – केंद्र’ संबंधांवर रोखठोक मतप्रदर्शन!

निमित्त राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या सुटकेच्या शिफारशीचे, पण मुद्दा संघराज्य रचनेला धक्क्याचा!

April 28, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

दिवंगत राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या सुटकेबद्दलच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल – राज्य सरकार आणि केंद्र यातील संबंधांवर महत्वाचं भाष्य केलं आहे. यात महत्वाची बाब अशी की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तामिळनाडूच्या राज्यपालांच्या कृतीला आक्षेप घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर स्वत: सक्षम असतानाही निर्णय घेतला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा हवाला देत सुनावलं आहे, राज्यपाल राज्य मंत्रिमंडळाची शिफारस आणि सल्ला यांना बांधील असतात, त्यांना जर पटले नाही तर ते राज्याकडेच परत पाठवू शकतात. तसे न करता केंद्राकडे पाठवणे म्हणजे संघराज्य रचनेला धक्का असल्याचे म्हटले आहे.

प्रकरण काय?

२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या हत्येच्या कट रचणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या आरोपींना २२ वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची २२ वर्षांची शिक्षा भोगून पुर्ण झाल्याने एजी पेरारिवलन याची सुटका का करू शकत नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्राला विचारला आहे

राज्यपालांच्या कृतीमुळे वाद!

या प्रकरणात सरकारने विचित्र भूमिका घेतल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. विशेष म्हणजे, तामिळनाडूच्या राज्यपालांनी दोषीला सोडण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतींकडे पाठवला, खरंतर ते स्वतःच दयेच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे सक्षम आहेत. जर सुटकेची शिफारस केली जात आहे, तर केंद्र पेरारिवलनला सोडण्यास का तयार नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे काय आक्षेप?

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, प्रथमदर्शनी असे वाटते की राज्यपालांचा निर्णय चुकीचा आणि घटनेच्या विरुद्ध आहे, कारण ते राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला बांधील आहेत आणि त्यांचा निर्णय घटनेच्या संघीय संरचनेवर आघात करते. न्यायमूर्ती एलएन राव आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने केंद्रातर्फे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांना आठवडाभरात योग्य निर्देश देण्यास सांगितले अन्यथा ते पेरारिवलन यांची याचिका स्वीकारून या न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार त्यांची सुटका करतील.

राज्यपालांनी काय केलं?

घटनेच्या कलम १६१ अन्वये दयेच्या अर्जावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना नाही हा विचित्र युक्तिवाद आहे. किंबहुना ते राज्यघटनेच्या संघराज्य रचनेवर आघात करते. राज्यपाल राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. न्यायमूर्ती राव म्हणाले की, राज्यपाल राज्य मंत्रिमंडळाच्या (दोषी) सोडण्याच्या निर्णयाशी असहमत असल्यास ते मंत्रिमंडळाकडे परत पाठवू शकतात पण राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाहीत. ही कारवाई चुकीची आहे आणि तुम्ही संविधानाच्या विरोधात युक्तिवाद करत आहात. राज्यपाल हे राज्य मंत्रिमंडळाच्या मदतीला आणि सल्ल्याला बांधील असतात.

केंद्राचा आदेश पाळणे हा संघराज्य रचनेवर हल्ला!

न्यायमूर्ती गवई म्हणाले की, केंद्राचा आदेश पाळायचा असेल तर तो संविधानाच्या संघराज्य रचनेवर हल्ला ठरेल. घटनेचे पुनर्लेखन करावे लागेल जेणेकरुन विशिष्ट परिस्थितीत कलम १६१ अंतर्गत प्रकरणे राष्ट्रपतींकडे पाठवता येतील. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि नटराज यांना पुढील सुनावणीच्या तारखेला सर्व मूळ कागदपत्रे आणि आदेश सादर करण्याचे निर्देश दिले कारण ते युक्तिवाद ऐकून निकाल देणार आहेत.


Tags: Rajiv GandhiSupreme CourttamilnaduTamilnadu Govtतामिळनाडूराजीव गांधीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

जेम्स मर्डॉक – उदय शंकर यांची अंबानींच्या Viacom 18मध्ये १३ हजार ५०० कोटींची गुंतवणूक!

Next Post

राज्यात १६५ नवे रुग्ण, १५७ बरे! मुंबई ९०, पुणे ३४, ठाणे २१

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १६५ नवे रुग्ण, १५७ बरे! मुंबई ९०, पुणे ३४, ठाणे २१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!