Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

११ वर्षात १४ हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १२९ नागरिक, १३८ सुरक्षारक्षक हुतात्मा!

संरक्षण आणि गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत फरक असल्यानं सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडांकडून आश्चर्य व्यक्त

September 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
RTI

मुक्तपीठ टीम

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून ११ वर्षात १४ हजाराहून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. गृहमंत्रालयाच्या सुरक्षा विभागाकडून सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती. सारडा यांनी यावेळी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांसोबतच स्थानिक, भारतीय लष्कर आणि पर्यटकांच्या झालेल्या हानीचाही तपशील मागितला होता. त्यांना याआधी संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीतील आकडेवारी आणि आता गृहमंत्रालयाकडून मिळालेली आकडेवारी यात फरक असल्याचे सांगत, त्यांनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

माहितीच्या अधिकारातला तपशील खालीलप्रमाणे :

१४ हजार ४११ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन!

  • २००४ पासून १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एलओसी आणि एलएसीवर पाकिस्तान आणि चिनी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे.
  • यात सार्वजनिक, खासगी आणि सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
  • २०१० पासून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून १४ हजार ४११ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

 

११ वर्षात १२९ हुतात्मा आणि ७०८ स्थानिकांचा मृत्यू

  • जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१० ते २०२१ (फेब्रुवारी पर्यंत) स्थानिकांपेक्षा सुरक्षा दलातल्या जवानांची मोठी जीवितहानी झाली आहे.
  • ११ वर्षात १२९ मृत्यू आणि ७०८ स्थानिकांचा मृत्यू झाला आहे.
  • तर जम्मू -काश्मीरमध्ये सीमेपलिककडून झालेल्या गोळीबारात सुरक्षादलाच्या १३८ जवानांना वीरमरण आलं आहे तर ६६४ जण जखमी झालेत.

 

शस्त्र संधी उल्लंघनात झालेल्या हानीची नुकसानभरपाई

  • आरटीआयच्या अहवालात नुकसान भरपाईसंदर्भातलीही माहिती देण्यात आली आहे.
  • सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबियांना किंवा ५०% पेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ५ लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रोख मदत दिली जाते.
  • घरांचं, पिकांचं, पशुधनाचे नुकसान झाल्यासही नुकसान भरपाई मिळते.
  • दुधाळ जनावरांचे नुकसान झाल्यास ५० हजारांची रक्कम दिली जाते.
  • तसंच जम्मू आणि काश्मीर सरकार जखमी व्यक्तींना त्यांच्या सध्याच्या नियमांनुसार मदत देते.
  • राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) नुसार केंद्र सरकारकडूनही मदत मिळते.

हेही वाचा: सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांना आश्चर्य का वाटले?

याआधी संरक्षण मंत्रालयाकडून माहिती अधिकारातून मिळालेली माहिती:

काँग्रेसपेक्षा भाजपा सत्तेत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या, युद्धबंदी उल्लंघनात साडेचार हजार पट वाढ!


Tags: RTIआरटीआयएनडीआरएफगृहमंत्रालय
Previous Post

“पायाभूत निधी योजनेतून अल्पदरात कर्ज द्यावे”

Next Post

“पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
maha cm

"पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!