Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

गदारोळात लोकसभेत कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर

November 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
The Farm Laws Repeal Bill, 2021 passed by Lok Sabha

मुक्तपीठ टीम

कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तीन विद्यमान कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. त्याचवेळी, विरोधी पक्षांनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याबाबत तातडीने कायदा करण्याची मागणी केली. त्यावर चर्चा करू दिली नसल्याने विरोधकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेत गोंधळ सुरु झाला. लोकसभेत सुरु असलेल्या गदारोळातच कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणलेले विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत मांडले. गदारोळ सुरु असतानाच ते आवाजी मतदानाने मंजूर झाले.

 

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. २३ डिसेंबरपर्यंत चालणार असलेल्या या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलले गेले आहे.

 

आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरुवात होताच सभागृहातील वातावरण तापले. सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मांडले. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तीन विद्यमान कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. सभागृह सुरू होताच विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केला. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांनी चर्चा केली नाही तर संसद चालू देणार नाही, असे सांगितले होते. पण तरीही सरकारने चर्चेला संमती दिली नाही. सत्ताधारी पक्षाच्या मते, कायदा रद्द करत असताना चर्चा कशासाठी पाहिजे? मात्र, विरोधकांना इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा आवश्यक वाटत होती. अखेर भाजपाने बहुमताच्या बळावर कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मागे घेतले.

 

कृषीविषयक कायद्यांवर विरोधकांमध्ये मतभेद

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर चर्चेची मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारला या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी ते थेट मांडून आवाजी मतदानाने मंजूर करून घ्यायचे होते. बसपा आणि बीजेडीच्या नेत्यांनीही यावर चर्चा करण्याऐवजी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आवश्यक विधेयक लवकर पास करणे योग्य ठरेल, असे मत मांडले. त्यामुळे लोकसभेत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा न करताच सरकारने आवाजी मतदानाने विधेयक मंजुरीचा मार्ग निवडला.

गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित

विरोधकांच्या चर्चेसाठीच्या आग्रही भूमिका आणि सत्ताधारी पक्षाचा ताठरपणा यामुळे सभागृहात गोंधळ माजला. ‘पहिला दिवस जनता पाहत आहे’, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बजावूनही कोणी ऐकले नाही. त्यामुळे
लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूबही करण्यात आले होते. लोकसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळावर सभापती ओम बिर्ला म्हणाले की, पहिला दिवस आहे. जनता पाहत आहे. त्याचवेळी राज्यसभेचे कामकाजही 12.20 पर्यंत तहकूब करण्यात आले होते.

वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची बैठक घेतली.

सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं आंदोलन

तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या निदर्शनाचे नेतृत्व हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. त्या त्यासाठी संसदेत पोहचल्या.


Tags: farmer lawnarendra singh tomarParlimentWinter Sessionकृषी कायदेनरेंद्र सिंह तोमरलोकसभाहिवाळी अधिवेशन
Previous Post

सरकार संसदेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार, पण… :पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत

Next Post
varsha gaikwad

इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!