Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

शेतकरी आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक इशारा देणारा फलक

February 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
protest

मुक्तपीठ टीम

नवीन कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर चेतावणीचे फलक झळवून शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. पोलिसांनी लावलेल्या फलकात हिंदी आणि पंजाबी भाषेत एक मजकूर लिहिलेला आहे. त्यात म्हटले की, “वैधानिक इशारा, आपल्या सर्वांना येथे जमणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला इशारा दिला जात आहे, अन्यथा आपल्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.”

 

शेतकरी संघटनांनी राष्ट्रीय राजधानीतील टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळी दिल्ली पोलिसांनी लावलेल्या या चेतावणी फलकावर आक्षेप घेतला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी असा दावा केला आहे की, हे फलक नवीन नाहीत, आणि त्यात आंदोलकांना केवळ राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करू देणार नाही असे सूचित केले आहे. तसेच “हे फलक २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर लावण्यात आले आहेत”, असे अतिरिक्त डीसीपी (बाह्य) सुधांशु धामा यांनी सांगितले.

 

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले आहे त्यात म्हटले आहे की, “पोलिसांच्या या कारवाईचा आम्ही विरोध करतो. कारण आंदोलनकर्ते त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा वापर करत असल्याने पोलिसांच्या या निर्णयाला विरोध करतो आणि शेतकर्‍यांना शांततेन आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले”. तसेच “धमक्या आणि इशारे देऊन आंदोलन संपविण्याच्या षडयंत्राचा आम्ही विरोध करते”, असेही म्हटले आहे.


Tags: Farmer Delhi ProtestFarmer protestटिकरी सीमाशेतकरी आंदोलनशेतकरी संघटनासंयुक्त किसान मोर्चा
Previous Post

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल?

Next Post

मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉल 

Next Post
maharashtra

मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!