Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“लवकरच ओबीसी राजकीय आरक्षणाचं भवितव्य ठरणार? मागासवर्ग आयोग आकडेवारी तपासून देणार अंतरिम अहवाल!”

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकार, आयोगाला आदेश

January 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा नवा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणावरून डिसेंबर २०२१ चा आदेश मागे घेण्यास नकार दिला. तसेच देशातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात इतर मागासवर्गीयांना आकडेवारीची सत्यता त्रिस्तरीय तपासणीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही असेही सांगितले. मात्र, त्याचवेळी राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली आकडेवारी राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडे सादर करावी. आयोगाने दोन आठवड्यात त्रिस्तरीय तपासणी करून दोन आठवड्यात अंतरिम अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयात काय घडले?

  • महाराष्ट्राने न्यायालयाला राज्याकडे आधीच उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासह राज्यातील स्थानिक निवडणुका घेण्याची परवानगी मागितली आहे.
  • न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.
  • राज्याकडे असलेल्या आकडेवारीची छाननी करण्याऐवजी ही आकडेवारी राज्याने नेमलेल्या आयोगासमोर मांडणे योग्य ठरेल, जो त्यांची सत्यता तपासू शकेल.
  • खंडपीठाने सांगितले की, जर आयोगाला योग्य वाटत असेल तर त्यांनी राज्याला शिफारसी कराव्यात, ज्याच्या आधारावर राज्य किंवा राज्य निवडणूक आयोग पुढील पावले उचलू शकेल.
  • राज्य सरकारकडून आकडेवारी मिळाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत आयोग संबंधित अधिकाऱ्यांना सल्ला दिल्यास, आपला अंतरिम अहवाल देऊ शकेल.

ही आकडेवारी केंद्रापेक्षा वेगळी!

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या संदर्भात राज्य सरकारने तयार केलेली यादी केंद्राने केलेल्या जनगणनेपेक्षा वेगळी असेल.

 

महाराष्ट्राप्रमाणेच स्थानिक निवडणुका असलेल्या इतर राज्यांनाही निर्णय लागू!

ज्या राज्यांमध्ये स्थानिक निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमध्ये ही टिप्पणी लागू होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जोपर्यंत तीन टप्प्यांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या मानल्या जातील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे म्हणाले की, राज्याकडे काही आकडेवारी आहे ज्याच्या आधारे आरक्षण राखले जाऊ शकते. ते म्हणाले की, मार्चमध्ये निवडणुका आहेत आणि त्याची आकडेवारी आधीच आयोगाकडे आहे. ते म्हणाले की, आयोगाला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले जाऊ शकते जेणेकरून सरकार मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर काम करू शकेल. अन्यथा समाजातील एक मोठा वर्ग प्रतिनिधित्वापासून वंचित राहू शकतो.

 

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकार व ओबीसीना मोठा दिलासा : प्रा. हरी नरके

आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी व राज्य सरकार यांना मोठा दिलासा देणारा निकाल दिला. काल ओबीसी आरक्षणाविना निवडणुका झाल्या त्याचे निकाल आज आले. येत्या फेब्रुवारीत बऱ्याच निवडणूका होणार आहेत.निदान तिथेतरी ओबीसी आरक्षण राहावे यासाठी एक तोडगा राज्याने सुचवला होता तो न्यायालयाने स्वीकारला. राज्याकडे उपलब्ध असलेली ग्रामीण विकास खात्याच्या विबिध अभ्यासातली आकडेवारी, नमुना पाहण्या व Secc 2011 चा (जात वगळून मिळालेला उर्वरित ) डेटा यांच्या आधारे तात्पुरता दिलासा देता येतो हे न्यायालयाने मान्य केले. हा राज्य सरकारचा मोठा विजय आहे.
महाविकास आघाडी सरकारचे अभिनन्दन!
राज्य मागास वर्ग आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार सहानुभूतीचा व सामाजिक न्यायाचा दृष्टीकोन स्वीकारून ओबीसी आरक्षण तात्पुरते वाचवू शकते ही मोठी गोष्ट आहे: प्रा. हरी नरके


Tags: OBC political reservationstate govtSupreme Courtओबीसी राजकीय आरक्षणराज्य आयोगराज्य सरकारसर्वोच्च न्यायालयहरी नरके
Previous Post

नेते मोठे, मतांचे तोटे! नगर पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या नेत्यांना मतदारांचे फटके!!

Next Post

भाजपाची मनोहर पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी नाही, पण दुसरा पर्याय पुढे केला! काय घडणार?

Next Post
Goa BJP

भाजपाची मनोहर पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी नाही, पण दुसरा पर्याय पुढे केला! काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!