Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लालबहादूर शास्त्रींचे देशाला नवी दिशा देणारे विचार…नक्की वाचा!

October 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं, प्रेरणा
0
lal bahadur shastri

मुक्तपीठ टीम

साधा-सुधा माणूस. कल्पनाही केली नसेल कुणी की ते भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान होतील. पण पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतरच्या नैराश्यमय परिस्थितीत त्यांच्याकडे देशाची सुत्रं आली. या साध्या माणसाच्या उच्च विचारांमुळे नेतृत्व झळाळून उठलं. त्यांची जय जवान जय किसान ही २६ जानेवारी १९६५ रोजीच्या प्रजासत्ताकदिनी दिलेली घोषणा प्रत्येकाची आपली घोषणा झाली.

 

केवळ तेवढ्यापुरती नाही तर आजपर्यंत आणि कायमच असेल. उंचीनं लहान असले तरी शास्त्रीजींची बहादुरीची उंची वेगळीच. देशाला १९६२च्या चीन पराभवाच्या नैराश्यातून नव्या दमानं बाहेर काढणारा १९६५च्या युद्धातील पाकिस्तानवरील दणदणीत विजय त्यांच्या नेतृत्वाखालीच मिळवला गेला. अशा या महान नेत्याचे आजवर मनावर कोरले गेलेले निवडक विचार:

 

विचार असे की जे झाले जीवनधर्म!

  • जय जवान जय किसान
  • आपण युद्धात जितके धैर्याने लढतो तितकेच शांतीसाठी लढले पाहिजे.
  • देशाप्रती निष्ठा सर्व निष्ठांच्या आधी येते आणि ती पूर्ण निष्ठा आहे, कारण त्या बदल्यात काय मिळेल याची कोणीही वाट पाहत नाही.
  • जेव्हा देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात येते, तेव्हा त्या आव्हानाला पूर्ण शक्तीने सामोरे जाणे हे सर्वांचे एकमेव कर्तव्य आहे आणि यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या त्यागासाठी एकत्र तयार असले पाहिजे.

 

प्रत्येकच असावा योद्धा…

  • आपण सर्वांनी आपल्या क्षेत्रात त्याच समर्पणाने आणि उत्साहाने कार्य केले पाहिजे जे योद्ध्याला युद्धभूमीवर त्याच्या कर्तव्याच्या दिशेने प्रेरित करते आणि ते फक्त बोलत नाही तर करत असतात.
  • असत्य आणि हिंसेच्या सामर्थ्याने खरे स्वराज्य किंवा लोकशाही कधीच मिळू शकत नाही.
  • स्वातंत्र्याचे संरक्षण हे केवळ आपल्या देशाच्या सैनिकांचे काम नाही, त्याचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण देशाला सशक्त व्हावे लागेल.
  • देशाच्या सामर्थ्यासाठी आणि सामर्थ्यासाठी, लोकांमध्ये एकता प्रस्थापित करणे हे सर्वात महत्वाचे कार्य आहे.
  • आमचा स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी शांती, विकास आणि कल्याण यावर विश्वास आहे.

 

जशी उक्ती तशीच कृती!

  • जर मी दुसऱ्या कोणाला सल्ला दिला आणि मी स्वतः तो पाळला नाही तर मला अस्वस्थ वाटते.
  • कायद्याचा आदर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना अबाधित राहील आणि आपली लोकशाही मजबूत राहील.
  • शासन करणाऱ्यांनी लोकांची प्रतिक्रिया कशी ते पाहायलाच पाहिजे, कारण लोकशाहीत लोक हे प्रमुख असतात.
  • मला वाटते की प्रशासनाची मूलभूत कल्पना समाज एकसंध ठेवणे असावी जेणेकरून समाज विकसित होऊ शकेल आणि त्याचे ध्येय पूर्ण करू शकेल.
  • जर आपण सतत परस्परांशी लढत राहिलो तर आपल्याच लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, लढण्याऐवजी आपण गरिबी, रोग आणि निरक्षरतेशी लढले पाहिजे.

 

मेणाहून मऊ, पण वज्राहून कठीण! पाकड्यांची खोड मोडणारे लाल बहादूर शास्त्री!


Tags: Inspirational Thoughtslal bahadur shastriजय जवान जय किसानपंतप्रधान पंडित नेहरूलालबहादूर शास्त्री
Previous Post

“पवारसाहेबांवर…राष्ट्रवादीवर सिन्नरकरांनी भरभरून प्रेम केले, उतराई होण्यासाठी या भागाला पाणी देणार”: जयंत पाटील

Next Post

वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ३०% जागा राखीव ठेवण्याची आरोग्य मंत्री टोपेंची सूचना

Next Post
Rajesh Tope

वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ३०% जागा राखीव ठेवण्याची आरोग्य मंत्री टोपेंची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!