Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात

केंद्र सरकारच्या ठोस धोरणाअभावी देशभर लसीकरण मोहिमेत गोंधळ!: बाळासाहेब थोरात

May 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
balasaheb thorat

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र केंद्र सरकारची चुकीचे धोरणे आणि गलथानपणामुळे लसीकरण मोहिम राबविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. केंद्र सरकारचे नियोजनच नसल्याने मोहिमेत गोंधळ उडाला आहे. कोविन अॅपने या गोंधळात भर घातली असून परराज्यातील लोकही कोविन अॅप द्वारे नोंदणी करून राज्यात लसीकरणासाठी येत आहेत. लसीचा तुटवडा, केंद्राचा नियोजनशून्य कारभार, राज्य सरकारांना अहसकार्य करण्याच्या भूमिकेमुळे देशभरात लसीकरण मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

 

रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना थोरात म्हणाले की, कोरोनाची परिस्थीत हातळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलेच आहे. आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे देशातील लसीकरण मोहिमेचाही बोजवारा उडाला आहे. ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात लस दिली नाही. कोरोना प्रतिबंधक लसींचा सर्वात मोठा उत्पादक असणाऱ्या भारतामध्ये लस पुरवठ्याअभावी लसीकरण केंद्रे बंद आहेत याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे.

 

४५ वर्षावरील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस मिळत नाही. १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारने केली पण त्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलली. लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतानाही फक्त घोषणा करून पंतप्रधानांनी आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून पळ काढला. केंद्र सरकारकडून आवश्यक त्या प्रमाणात लसींचा पुरवठा नसल्याने ४५ वर्षांवरील तसेत १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहिम ठप्प आहे.

 

लसीसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या कोविन अॅपवर नोंदणी करावी लागते परंतु या अॅपमुळे मोठा गोंधळ होत आहे. कोणीही, कोणत्याही केंद्रावर नाव नोंदवून लस घेऊ शकतो. नगर जिल्ह्यातील घुलेवाडी केंद्राला ४०० डोस प्राप्त झाले होते. या केंद्रावर लस घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून १८० लोक आले. यात नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यातील लोक होते पण विशेष म्हणजे हैद्राबादमधूनही काही लोक आले होते. लसीसाठी लोक जीवाचे रान करत आहेत. असे प्रकार इतर केंद्रावरही होत असतील. महाराष्ट्र सरकारने लसीकरणासाठी राज्य सरकारच्या स्वतंत्र अॅपला परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा विनंती करुनही केंद्र सरकारकडून यावर अद्याप सकारात्मक उत्तर मिळालेले नाही.

 

कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नाही आणि त्यासाठी कोणतेही नियोजन केलेले दिसत नाही. केंद्र सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून टास्क फोर्स नेमला. तरीही केंद्र सरकार काही जागे झाले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून काही नियोजन करणे अपेक्षित असताना केंद्र सरकारने त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या दरम्यानच्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. पंतप्रधानांसह केंद्रातील अनेक मंत्र्यांनी हजारोंच्या भव्य सभा घेतल्या. आता देशभरात कोरोनाने जे थैमान घातले आहे, दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. त्याला निवडणुकीच्या प्रचार सभा, धार्मिक कार्यक्रमांमधील गर्दी, तसेच केंद्र सरकारचा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. आतातरी केंद्राने जागे व्हावे आणि लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे थोरात म्हणाले.


Tags: balasaheb thoratcoronacowin appprime minister narendra modivaccinationकेंद्र सरकारबाळासाहेब थोरात
Previous Post

“मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘चि’ दिले!”: नाना पटोले

Next Post

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

Next Post
yashomati thakur

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!