Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाचे ऑपरेशन लोटस : याआधी कोणत्या राज्यांमध्ये फुललं, कोणत्या राज्यांमध्ये कोमेजलं?

June 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP Lotus

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे निष्ठावंत मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा स्थितीत भाजपाला अधिक संख्याबळ मिळाल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येऊ शकते. यामुळे भाजपाने महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटसची सुरुवात केली की काय अशी चर्चा होत आहे. यापूर्वीही भाजपाने काही राज्यांमध्ये हा प्रयोग केला होता.

गोवा:

२०१७ साली गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. पण, भाजपाने इथेही ऑपरेशन लोटस सुरू केले आणि काँग्रेसच्या १० आमदारांनी एकाच वेळी राज्यपालांकडे राजीनामे सादर केले. सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला. इथेही भाजपाला सरकार स्थापन करण्यात यश आले.

कर्नाटक:

२०१८ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. पण, बहुमताच्या आकड्यांपासून दूर होता. त्यावेळी जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले होते. मग ऑपरेशन ‘लोटस’चा प्रयोग करण्यात आला. वर्षभरानंतर या दोन्ही पक्षांच्या अनेक आमदारांनी एकत्र राजीनामे दिले. त्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार पडले. कर्नाटकात भाजपाने सरकार स्थापन केले. तेव्हा विरोधकांनी भाजपावर ऑपरेशन लोटसचा आरोप केला.

अरुणाचल प्रदेश:

२०१६ मध्ये अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. मात्र पक्षांतर्गत वाद निर्माण झाला होता. यानंतर काँग्रेसच्या ४२ आमदारांनी बंडखोरी केली. या सर्वांनी पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) ची स्थापना केली आणि भाजपासोबत युतीचं सरकार स्थापन केलं. नंतर पीपीए पक्ष भाजपामध्ये विलीन झाला.

मध्य प्रदेश:

२०२०मध्ये मध्य प्रदेशातही ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत १५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. कमलनाथ यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी समोर आली. काही काळानंतर त्यांनी बंड केले. ज्योतिरादित्य यांनी २२ आमदारांसहीत भाजपामध्ये प्रवेश केला. या बंडखोर आमदारांमध्ये तत्कालीन कमलनाथ सरकारमधील तब्बल १४ मंत्र्यांचाही समावेश होता. त्यानंतर भाजपाचे शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी भाजपाने सिंधिया यांना राज्यसभा खासदार करून केंद्रीय मंत्री केले.

खालील राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी

भाजपाचे ऑपरेशन लोटस सर्वत्र यशस्वी झाले असे नाही. अशी काही राज्ये आहेत जिथे सर्व प्रयत्न करूनही भाजपाची कारवाई यशस्वी होऊ शकली नाही. यामध्ये उत्तराखंड, राजस्थानचा समावेश आहे.

उत्तराखंड :

२०१६ मध्ये उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारला नऊ आमदारांच्या बंडाचा सामना करावा लागला होता. या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. त्यानंतर राज्यपालांनी काँग्रेस सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी काँग्रेसने या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला होता. बंडखोर आमदारांनी नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने काँग्रेसने सरकारला वाचवले.

राजस्थान:

राजस्थानमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पायलट आणि गेहलोत यांच्यातील भांडण चव्हाट्यावर येऊ लागली. सार्वजनिक व्यासपीठावर दोघेही एकमेकांचा उघडपणे विरोध करत होते. २०२० मध्ये अचानक सचिन पायलट आपल्या समर्थक ३० आमदारांसह दिल्लीत पोहोचले. तेव्हा हे बंडखोर आमदार भाजपाला पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने हा वाद कमी केला. भाजपाचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले नाही.


Tags: BJPBJP Operation LotusMaharashtraभाजपाभाजपा ऑपरेशन लोटसमहाराष्ट्र
Previous Post

महाराष्ट्रातील राजकारण, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद!

Next Post

अपात्र, राजीनामा दिलेल्या सदस्यांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदीची सर्वोच्च न्यायालयात मागणी

Next Post
supreme court

अपात्र, राजीनामा दिलेल्या सदस्यांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदीची सर्वोच्च न्यायालयात मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!