Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता मे-जूनमध्येही मिळणार ताजी द्राक्षं, नव्या वाणाचा शोध

February 12, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
draksh

मुक्तपीठ टीम

 

मध्यप्रदेशातील मंदसौर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठातील कृषि संशोधकांनी द्राक्षांची नवे वाण शोधले आहे. त्यांनी विकसित केलेल्या वाणाची द्राक्षे नेहमीच्या हंगामात नाही तर नंतरही येतील. त्यामुळे आता मे-जूनमध्येही द्राक्षे बाजारात येऊ शकतील. याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही होणार आहे.

 

साधारणत: ऑक्टोबरमध्ये द्राक्ष वेली तयार होऊन डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पीक हाती येते. दरवर्षी हंगामात देखभाल व रोपांची छाटणी करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मार्चपासून मागणी शक्य असूनही द्राक्षे मात्र तेवढी नसतात. त्याचा फायदा उचलत गेली काही वर्षे भारतातील महानगरांमध्ये चिनी द्राक्षे मिळत आहेत. आकाराने मोठी असली तरी भारतीय द्राक्षांशी तुलना करता त्यांची चव तेवढी चांगली नसते. तरीही केवळ दुसरी द्राक्षे नसल्याने ती महागडी विकली जातात. बाजारातील ही संधी आणि जेथे द्राक्षांचे उत्पादन शक्य नसते तेथेही ते घेता यावे याउद्देशाने कृषि संशोधक द्राक्षांच्या नव्या वाणावर संशोधन करत होते.

 

मे-जूनमध्ये द्राक्षे तयार करण्याचे तंत्र विकसित करण्यासाठी संशोधकांनी चार वर्षे कठोर परिश्रम केले आहेत. द्राक्षवेली एकदा लावल्यानंतर दरवर्षी १० ते १२ पिके घेतली जातात. मुख्यत: आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथील द्राक्षे जास्त लोकप्रिय आहेत. तेथेच सर्वात जास्त उत्पादनही होते.

 

कृषि संशोधन केंद्रातील कृषिशास्त्रज्ञांनी नवीन हंगामासाठी द्राक्षांच्या विविध वाणांच्या वेलाची कापणी केली. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात त्यांची चाचणी घेतली. गुणवत्ता आणि उत्पादनाचा अभ्यास केला. यातून असे समोर आले की, उन्हाळ्याच्या हंगामात फ्लेमसीड लॅस द्राक्ष वाणांचे उत्पादन ९० ते ११० दिवसांमध्ये घेतले जाऊ शकते. १३० ते १४० दिवसात किसिमिस वाणापासून दर्जेदार उत्पादन मिळू शकते. मंजरी आणि श्यामा या वाणांचे उत्पादन १२० ते १२५ दिवसांत करता येते.

 

मंदसौरमधील द्राक्षे संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. नितीन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी फेब्रुवारी महिन्यात द्राक्ष पिके घेतात, पण या तंत्राच्या माध्यमातून आता शेतकरी मे-जूनमध्ये द्राक्ष पीक घेऊ शकतील. मे-जूनमध्ये येणारी द्राक्षे अधिक गोड असतील. पारंपारिक हंगामापेक्षा उत्पन्न अधिक असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: grapesRajmata Vijayaraje Scindia Agricultural Universityमंदसौरमध्यप्रदेशराजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठ
Previous Post

भाजपाविरोधात काँग्रेसचे २ लाख ‘गांधीदूत’! आज नाना पटोलेंचा पदग्रहण कार्यक्रम

Next Post

कोरोना संकटात आईचे मुलाला मुत्रपिंड दान, डॉक्टरांची कमाल!

Next Post
Dr

कोरोना संकटात आईचे मुलाला मुत्रपिंड दान, डॉक्टरांची कमाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!