Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“कोरोना मृत्यूंसाठी मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची! महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी ‘सन्मानजनक’ आहे?”

September 23, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
corona

टी. विश्वनाथ / व्हा अभिव्यक्त!

कोरोनाने मृत्यू ओढवलेल्यांच्या वारसांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे, अशा बातम्या सर्वत्र आल्या आहेत. हा नक्कीच दिलासा आहे. पण हा दिलासा पुरेसा म्हणता येणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेल्यानंतर न्यायालयीन नोटिसीनंतर केंद्र सरकारने पन्नास हजार देण्याची तयारी दर्शवली आहे. न्यायालयाने चार लाख देता येणार नाही, या केंद्राच्या मताशी सहमती दाखवली आहे. पण न्यायालयाने वापरलेल्या सन्मानजनक भरपाई या शब्दाच्या व्याख्येत एका कमवत्या माणसाच्या मृत्यूमागे सध्याच्या महागाईच्या काळात पन्नास हजाराची भरपाई ही सन्माजनक कशी म्हणता येईल, असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा.

 

कोरोना बळींच्या नुकसानभरपाईबद्दल नेमकं काय घडलं?

  • केंद्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
  • या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने प्रत्येक मृत्यूमागे ५० हजार रुपयांची मदत देण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे.
  • ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली आहेत.
  • कोरोनाने मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून अर्ज मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत अर्ज निकाली काढेल.
  • आधारशी जोडलेल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे थेट भरपाई दिली जाईल, त्यामुळे ज्याचं त्याला मिळेल, हे चांगलं आहे.
  • हे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनद्वारे म्हणजेच NDMAद्वारे देण्यात आले आहेत.

 

कोरोना नुकसानभरपाई तक्रारींचे काय करणार?

  • भरपाई प्रकरणी तक्रारींचे निरसण करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती स्थापन केली जाईल.
  • या समितीत कोरोना संकटात मदत आणि बचाव कार्यात सहभागी असणाऱ्यांपैकी काहींना सहभागी केले जाईल.
  • तीस दिवसांच्या आत तक्रीरींवर कार्यवाही केली जाईल.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सरकार हलले, मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची!

  • कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ५० हजारांची मदत देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे.
  • पण सरकारने ही तयारी उगाच दाखवलेली नाही.
  • या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
  • या याचिकेत कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

 

कोरोना ही भूकंप, पूर यापेक्षाही भीषण आपत्ती…मग भरपाई कमी का?

  • भूकंप, पूर यासारख्या बारा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या आपत्ती कायद्याच्या कक्षेत येतात.
  • या आपत्तींमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीतून ४ लाख रुपयांच्या भरपाईचे आश्वासन दिले जाते.
  • पण कोरोना महामारी त्यापेक्षा वेगळी आहे, असा युक्तीवाद सरकारने नोटिशीला उत्तर देत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं.
  • सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारचा हा युक्तिवाद मान्य केला.
  • पण कोरोना मृतांच्या वारसांना किती रक्कम द्यायची हे सरकारने स्वतः ठरवावं. पण वारसांना नुकसान भरपाईची रक्कम सन्माजनक मिळाली पाहिजे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
  • असं जरी असलं तरी लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी संवेदनशीलतेने लक्ष घालून रक्कम वाढवून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने कमी रकमेचा युक्तिवाद मान्य करतानाच सन्मानजनक हा शब्द वापरला आहे, सध्याच्या महागाईच्या काळात ५० हजाराची नुकसानभरपाई सन्मानजनक म्हणता येईल का?

 

कोरोना बळींच्या वारसांना फक्त ५० हजार! केंद्र सरकारचे संतापजनक प्रतिज्ञापत्र


Tags: compensation of Corona victimscoronaNDMAT Vishwanathकोरोनाटी. विश्वनाथ
Previous Post

कोरोना बळींच्या वारसांना फक्त ५० हजार! केंद्र सरकारचे संतापजनक प्रतिज्ञापत्र

Next Post

पेगॅसस व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी प्रकरणात चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Next Post
sc

पेगॅसस व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी प्रकरणात चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!