Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाळाचा घोष आणि नामाचा गजर, आपोआप येतो ब्रम्हानंद नाचत नाचत!

वारी जनातली, जनांच्या मनातली- १५

July 18, 2021
in featured, धर्म
0
टाळाचा घोष आणि नामाचा गजर, आपोआप येतो ब्रम्हानंद नाचत नाचत!

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम

डॉ. तेजस वसंत लोखंडे

ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालया |
नामा तयाचा किंकर | तेणे केला हा विस्तार |
जनार्दनी एकनाथ | खांब दिला भागवत |
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश |

 

ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या प्रतिभा सामर्थ्याने वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. संत नामदेवांनी त्यांच्या पश्चात वारकरी संप्रदायाचे विचार अगदी पंजाबापर्यंत पोहोचवले. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून लिहिली तसेच भागवत धर्माला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आणि आपल्या सहज सोप्या वाणीने अनेक अभंगाची रचना करून या परमार्थाच्या मार्गाची आवड जनसामान्यांच्या मनात निर्माण करून तुकाराम महाराजांनी या संतांच्या कामावर कळस चढवला. म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा ही प्रस्थान त्रयी मानली गेली.

 

संत श्रेष्ठांच्या या वारीत अनेक आश्चर्ये घडत असतात. भक्तिरसाने न्हाऊन निघणारी ही मंडळी अनेक तत्वांचे पालन करून चालतात. अद्वैताच्या संकल्पनेला इथेच सुरुवात होते. समस्त चराचर समान पातळीवर दिसू लागतात. भेदाभेदाचे पाश गळून जातात आणि त्यातून घडतो एक वारकरी.

 

भजन आणि नामसंकीर्तन हे वारकरी संप्रदायाचे अविभाज्य भाग. भजने गाताना वारकऱ्यांचे चित्त हरपते, त्याला कसलेच भान रहात नाही, ज्याच्या दर्शनाची आस घेऊन तो निघाला आहे त्याच्याशी तो तादात्म्य पावतो. माणसाचे मन मोठे चंचल आहे. विषयाकडे धावणे हे मनाचे काम आहे. विषयलोलुपतेने अनेकदा अनेक प्रमाद घडून येतात. विषयाकडे धावणाऱ्या मनाला लगाम घालायचे काम नामसंकीर्तनाने साध्य केले जाते.

 

वारकऱ्यांच्या जीवनात काही गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. या गोष्टींशिवाय वारकऱ्यांची कल्पना करणे अशक्य आहे.

 

वारकऱ्यांच्या गळ्यात असलेल्या वीणेला फार महत्व. वीणेची निर्मिती खुद्द भगवान शंकराने केली. त्यातून निघणाऱ्या सुरांना भुलून नारदाने ती भोळ्या शंकराकडून मागून घेतली. हीच वीणा गळ्यात बांधून त्यांनी त्रैलोक्यात भ्रमण केले. साधूसंतांनी पुढे ती आपलीशी केली व त्या वीणेच्या साहाय्याने भजनाचा आविष्कार केला.

 

तुळशी माळ आणि तुळशी वृंदावन ही वारकऱ्यांची दोन प्रतीके आणि श्रद्धास्थाने आहेत. आधुनिक वैद्यक विश्वानेही तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म मान्य केले आहेत. समुद्रमंथनात निघालेल्या अमृताचे काही थेंब जिथे सांडले तिथे तुळशीची उत्पत्ति झाली अशीही तुळशी जन्माची कथा सांगितली जाते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला शुद्ध करणारी ही तुळशी विष्णूला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच विष्णूच्या वैष्णवांना तुळशीचे फार महत्व आहे. ही माळ जो धारण करतो तो आपल्या देहावर व ऐहिक प्रपंचावर तुळशीपत्र ठेवतो असेही एक रुपक मानले जाते.

 

कपाळी गोपीचंदनाचा टिळा किंवा गंध त्यावर अबीर आणि कुंकुमाचे दोन ठिपके वारकऱ्यांचे सौन्दर्य फार खुलवते. स्नानानंतर कपाळी गंध सर्वांगी चंदनाचे पट्टे अंगावर उमटवल्याशिवाय वारकऱ्याचा दिवस चालू होत नाही. या गोपीचंदनाच्या स्पर्शाने सर्वांगाला शीतलता प्राप्त होते असा या भाबड्या लोकांचा विश्वास आहे. शरीरातील सत्व गुणाच्या वर्धनासाठी शांत रहाणे आवश्यक आहे. ती मनाची शांती या गोपीचंदनाने मिळते. अबीर हे वैराग्याचे प्रतिक म्हणून त्याला महत्व आहे.

 

आकाश तत्वाच्या उत्पत्ति बरोबर शब्दाची उत्पत्ति झाली. जगाच्या अंतापर्यंत चिरकाल टिकणारी गोष्टही शब्दच आहे. टाळातून निर्माण होणारा ताल वारकऱ्याला ‘स्व’ विसरायला लावतो. टाळ आणि टाळी यामध्ये ब्रम्हानंद उभा रहातो. टाळाचा घोष आणि नामाचा गजर झाला की आपोआप ब्रम्हानंद नाचत नाचत येतो.

 

एकादशी व्रत हे वारकऱ्यांचे लक्षणसवरूप आहे, धर्म आहे. भगवान विष्णूची ही आवडती तिथी म्हणून एकादशीला महत्व आहे. शेकडो अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त करून देण्याची शक्ती या एका व्रतात आहे.

 

वारीच्या वाटचालीत फुगडी खेळला नाही असा वारकरी सापडणार नाही. वैष्णव जन वाळवंटी निरनिराळे खेळ खेळतात. हे खेळ खेळत असताना ते मनातला द्वैत भाव विसरून जातात, भेदाभेद विसरतात. क्रोध, अभिमान पायदळी टाकून ते एका वेगळ्याच ऊंचीवर पोहोचतात. या फुगडीचे अनेक प्रकार वारकरी खेळतात. बसफुगडी, दंडफुगडी, जातेफुगडी, नकुल्या, भुईफुगडी इत्यादी अनेक प्रकार आहेत. या फुगडीच्या जोडीने इतरही अनेक खेळ खेळले जातात. हे खेळ वारकऱ्यांच्या मनातला वृथा अभिमान नष्ट करतात. आणि याच आनंदात वारकरी विठूला आळवताना म्हणतो.

 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाई रे ||
क्रोध अभिमान केला पावटणी | एका एका लागतील पायी रे ||

 

DrNarendraKadam-DrTejasLokhande

(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb.  लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.

त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)


Tags: Dr narendra kadamdr tejas lokhandewariज्ञानेश्वर माऊलीडॉ. तेजस वसंत लोखंडेडॉ. नरेंद्र भिकाजी कदमवारकरी pandharpur
Previous Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कॉन्स्टेबल्सच्या २५ हजार जागांसाठी भरती

Next Post

मुंबईत पावसाच्या कोसळधारा, तीन ठिकाणी दरड, भिंत कोसळून मृत्यू

Next Post
mumbai

मुंबईत पावसाच्या कोसळधारा, तीन ठिकाणी दरड, भिंत कोसळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!