Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘लेट्स रीड इंडिया फाऊंडेशन’ची आदरांजली, प्रा. एन. डी. पाटील यांच्या आयुष्यावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र मिळविण्याची संधी

January 22, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
lets read india essay competition

मुक्तपीठ टीम

आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व ठरलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्य कर्तृत्वाचा सर्वसामन्यांना परिचय व्हावा या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन लेट्स रिड इंडियाकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रुपये १० हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र हे प्रथम पारितोषिक, रोख रुपये ५ हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे द्वितीय पारितोषिक, तर रोख रुपये ३ हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात येतील. तर काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात येतील असे लेट्स रीड इंडीयाने कळवले आहे.

 

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत, तसेच विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनलेले प्रा. एन. डी. पाटील अखेरपर्यंत राज्यातील सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रा. एन. डी. पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही उत्तम काम केले होते. नुकताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचे पुण्यस्मरण व्हावे यासाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

सदर स्पर्धा हि सर्व वयोगटासाठी खुली असून कोणत्याही वयाच्या स्पर्धकाला यात सहभागी होता येईल, त्यासाठी कोणतीही वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच निबंध लेखन स्पर्धेसाठी किमान शब्द मर्यादा १००० ते कमाल २५०० शब्द एवढी निश्चित करण्यात आली आहे.

 

स्पर्धेचे नियम व अटी

  • निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात.
  • निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असावा.
  • निबंधाचे परिक्षण नामवंत अभ्यासक तसेच तज्ञपरिक्षकांमार्फत केले जाईल.
  • स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तक रुपात छापले जातील.
  • परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
  • निबंधाचा मजकुर हा स्वरचित असावा. कॉपी केलेला किंवा कोणत्या लेखाचा काही भाग घेतल्याचे लक्षात आल्यास प्रवेशिका बाद केली जाईल.

 

भाग घेण्याची अंतिम तारीख

स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२२ असून स्पर्धकाने निबंधासोबत आपली संपूर्ण माहिती पाठवावी. तसेच स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्याही मार्गाने सहभागी होऊ शकता.

 

निबंध कसे पाठवणार ?

  • आपण आपले निबंध लिहून स्कॅन करून किंवा टाईप करून वर्ड किंवा पीडीएफ फाईल स्वरूपात तयार करून letsreadf@gmail.com या ई-मेल द्वारे पाठवावेत.
  • Google फॉर्म द्वारे तुम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
  • लिंक – निबंध स्पर्धा : विषय : जेष्ठ नेते प्रा. एन डी पाटील
    https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScd5I71FN2LoVgekKNnWMSUct6Hs2ZlKgUJwZ6ZMD9BlJLYnw/viewform
  • यासोबतच आपला निबंध लिहून पोस्टाने देखील पाठवू शकता.
  • पत्ता
    ३११, द ग्रेट ईस्टर्न गॅलरीया, प्लॉट नं. २०, सेक्टर ४, ऑफ पाम बीच रोड, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई ४०० ७०६. फोन ०२२ २७७१०६४२.

Tags: Adaranjaligood newslets read india foundationmuktpeethN.D.PatilState Level Essay CompetitionTestimonialsआदरांजलीचांगली बातमीप्रशस्तिपत्रप्रा. एन. डी. पाटीलमुक्तपीठराज्यस्तरीय निबंध स्पर्धालेट्स रीड इंडीया फाऊंडेशन
Previous Post

मृत्यूपत्राविना वडिलांचा मृत्यू, लेकींना तरीही मिळणार मालमत्तेत वाटा!

Next Post

5G लाँच होण्यापूर्वीच जियोचा भविष्यवेध…’6Gजी’साठी ओलू विद्यापीठासोबत करार!

Next Post
jio 5G Internet

5G लाँच होण्यापूर्वीच जियोचा भविष्यवेध...'6Gजी'साठी ओलू विद्यापीठासोबत करार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!