मुक्तपीठ टीम
एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. तीन दिवसांच्या आत ईडीच्या या नोटीसविरोधात मी कोर्टात अपील करणार असल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
सरनाईक ईडीच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार…
- ईडीनं गेल्या आठवड्यातील माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मीरा रोड येथील भूखंड जप्त केल्याबद्दल मला आणि कुटुंबीयांना नोटीस पाठवलेलं आहे.
- त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणं उत्तर देतोय. आता २०२२ आहे आणि २४ नोव्हेंबर २०२० रोजी माझ्यावर कारवाई झाली होती.
- मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिली कारवाई होती.
- त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली.
- यानंतर मला अनेक लोकांनी विचारलं की तुमच्यावरील कारवाई संपली का ? मात्र, मी त्यानंतर कायदेशीर लढाई लढतोय.
तर, ईडीच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार.
कंगना आणि अर्णव गोस्वामीवर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई…
- कंगना आणि अर्णव गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई
- शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून कंगना रणौत आणि अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आली.
- केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करण्यात आली.
- माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे.
- न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.
- एनएसईएल म्हणजे काय हे मी तपासतोय.
- सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिल्यानंतर मी ईडीला सहकार्य केलं आहे.
- गेल्या आठवड्यात ईडीची नोटीस मिळाली होती.
तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष सुरु…
- विद्यार्थी नेता म्हणून मी पुढं आलेलो आहे.
- १९८९ पासून विहंग ग्रुपची स्थापना झाल्यानंतर व्यवसायात आलो आहे.
- विहंग ग्रुप आणि नंतर राजकारणात आलोय.
- सत्ताधारी पक्षाचा मी आमदार आहे.
- पहिल्यांदा माझ्यावर रेड झाली.
- तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष सुरु आहे.
- शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यावर काही ठिकाणी गनिमी कावा आणि काही ठिकाणी तह केले.
- राजकारणात तशा प्रकारची रणनीती राबवावी लागते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरनाईकांच्या पाठिशी…
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे.
- ते माझ्या पाठिशी आहेत.
- २०२० ला माझ्यावर कारवाई झाल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात गेलो.
- न्यायालयानं मला संरक्षण दिलं आहे.
- ईडीला जे प्रश्न विचारयेचे असतील ते विचारावेत, त्यांना सहकार्य करणार आहे.
- भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.