Thursday, May 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ठाकरेंचं वक्तव्य, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर! मध्यावधीची हूल की चाहूल?

November 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde And Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. मध्यावधी निवडणुकांच्या अंदाजामागे काय लॉजिक आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. त्यामुळेच मध्यावधीची हूल की चाहूल खरंच लागत आहे, हे मांडण्याचा प्रयत्न.

मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय?

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघमध्ये आयोजित कोकण महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
  • आम्हाला निवडणुकांची भीती नाही.
  • निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही.
  • तसंच, मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात?
  • आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत.
  • आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे.
  • काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे.
  • आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे.
  • निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात.
  • त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात.
  • आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा.
  • तसेच उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.
  • राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मध्यावधीची हूल की चाहूल?

राजकीय वर्तुळात मध्यावधी निवडणुकांविषयी २ मतप्रवाह आहेत:

मतप्रवाह -१

  • एकनाथ शिंदे यांना लाभलेलं मुख्यमंत्रीपद ही थेट दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद असल्यानेच हे उघड आहे.
  • त्यामुळे कमी आमदार असूनही त्यांना ते पद दिलं आहे.
  • दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असल्याने त्यांना धोका नाही, पद कायम तर सत्ता भक्कम आणि मग मध्यावधीची शक्यताच नाही, असं एक मत मांडलं जातं.

मतप्रवाह -२

  • दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असले तरी ते त्यांची गरज भागेपर्यंतच राहतील, ती भागत नाही, असं लक्षात आलं की कृपाछत्रही जाईल, असंही काहींना वाटतं.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लेखी मुद्दे, युक्तिवाद, संदर्भ प्रकरणे निकाल, पुरावे मागितलेआहेत, याचा अर्थ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागणं शक्य आहे.
  • जर संविधानाच्या १०व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार न्यायालयानं विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर आमदारांवर पद गमावण्याचं संकट ओढवू शकतं.
  • जर १६ आमदार अपात्र ठरले तरी सत्ता कायम राखण्यासाठी विरोधी पक्षातून देवेंद्र फडणवीसांनी आवश्यक कुमक तयार ठेवल्याची चर्चा आहे.
  • पण तशा अस्थिर परिस्थितीत पुन्हा फोडाफोडी करून माथ्यावर कलंक घेण्यापेक्षा, भाजपा नव्याने लोकांपुढे जाण्याचा पर्याय निवडू शकते.
  • अर्थात हा पर्याय निवडायचा की नाही, ते गुजरात, हिमाचल प्रदेश या २ राज्यांच्या निकालावर अवलंबून आहे, अशीही चर्चा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Cm Eknath ShindeMid Term ElectionUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमध्यावधी निवडणुक
Previous Post

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंकडून EWS आरक्षण निकालाचे स्वागत!

Next Post

एरोसोल प्रदूषणात महाराष्ट्र अतिधोकादायक रेडझोनमध्ये पोहचण्याची भीती!

Next Post
Maharashtra forecasted to enter ‘highly vulnerable’ red zone for aerosol pollution in 2023

एरोसोल प्रदूषणात महाराष्ट्र अतिधोकादायक रेडझोनमध्ये पोहचण्याची भीती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!