Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आता दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार नामधारी, राज्यपालच खरे अधिकारी!

April 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
delhi aap

मुक्तपीठ टीम

दिल्ली सरकार म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे सरकार ही परिस्थिती आता इतिहासजमा झाली. आता दिल्ली सरकार म्हणजे नायब राज्यपाल सरकार असणार आहे. या कायद्यानुसार दिल्लीत आता जनतेने निवडून दिलेल्या सरकारपेक्षा जास्त अधिकार नायब राज्यपालांना मिळणार आहेत. यावर आम आदमी पक्षाने विरोध करत, हा दिवस लोकशाहीसाठी काळा दु:खाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने दिल्लीत नवीन कायदा लागू केला आहे. गृह मंत्रालयाने दिल्लीत गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेन्डमेन्ट) अॅक्ट २०२१ (GNCT Act) लागू झाला असून आता दिल्लीतील खरे सरकार हे नायब राज्यपालच असतील हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक परिपत्रक काढून २७ एप्रिलपासून हा कायदा लागू झाल्याचं सांगितलं आहे.

निवडून आलेल्या सरकारला नामधारी बनवणारा कायदा

  • हा कायदा लागू झाल्यानंतर आता दिल्लीत सरकारचा खरा अर्थ नायब राज्यपाल असे झाले आहे.
  • दिल्लीत निवडून आलेल्या सरकारच्या तुलनेत नायबस राज्यपाल अनिल बैजल यांना जास्त अधिकार राहणार आहेत.
  • कुठलाही निर्णय घेण्यासाठी दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • सरकारला वैधानिक निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांपूर्वी नायब राज्यपालांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी ७ दिवसांपूर्वी नायब राज्यपालांची मंजुरी घेणे आता आवश्यक राहील.

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी दु:खद दिवस असल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल. तसेच लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर बंधने घालण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.आम्ही सत्तेची चावी सामान्य जनतेच्या हातात देण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवू. कितीही अडथळे आणले तरीही आम्ही आमचे चांगले कार्य सुरूच ठेवणार आहोत, त्यात कधीच खंड पडणार नाही.

राज्यसभेने २४ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त कायदे मंजूर केले. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या कायद्यात सरकार म्हणजे दिल्लीचे उपराज्यपाल. हे नमूद करते की हा कायदा विधिमंडळ आणि कार्यकारिणी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल. निवडून आलेले सरकार आणि राज्यपाल यांच्या जबाबदाऱ्यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजेच एनसीआर दिल्लीच्या शासनाची संवैधानिक योजनेनुसार परिभाषित केले जाईल.

यापूर्वीही ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली होती

  • दिल्ली सरकार आणि उप राज्यपाल यांच्या अधिकारासंबंधित लढाई यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.
  • तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, सरकार जनतेसाठी उपलब्ध असले पाहिजे आणि निवडून आलेले सरकार हेच सर्वोच्च आहे.
  • तत्कालीन सीजेआय दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने अधिकारांचे समन्वय असले पाहिजे, असे म्हटले होते.
  • दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळणे शक्य नाही, असे खंडपीठाने म्हटले होते.
  • दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असून राज्य सरकारला विशेष अधिकार देता येणार नाहीत.
  • न्यायालयाच्या म्हणण्यानुसार उपराज्यापाल हे दिल्लीचे प्रशासक आहेत.
  • कायदा बनवण्यापूर्वी आणि नंतर तो उपराज्यापाल यांना दाखवावा लागतो.
  • कॅबिनेट – उपराज्यापालमध्ये मतभेद असल्यास, हे प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठवावे.
  • केंद्र आणि राज्य संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजेत.

Tags: aam aadmi partyarvind kejriwaldelhiGNCT Actअरविंद केजरीवालआम आदमी पक्षकेंद्र सरकारदिल्ली सरकारनायब राज्यपाल सरकार
Previous Post

“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत” – पृथ्वीराज चव्हाण

Next Post

कोरोना उपाययोजनांसाठी पुणे जिल्ह्याला नीलम गोऱ्हेंकडून ६५लाखाचा निधी

Next Post
neelam Gorhe

कोरोना उपाययोजनांसाठी पुणे जिल्ह्याला नीलम गोऱ्हेंकडून ६५लाखाचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!