मुक्तपीठ टीम
देशातील गैरभाजपा पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांमध्ये ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढत आहेत. त्यामाध्यमातून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप होत असतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील गैरभाजपा सत्ताधाऱ्यांची एकजूट उभारण्याची सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह गैरभाजपा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
- ममता बॅनर्जी यांनी २७ मार्च रोजी हे पत्रं लिहिलं आहे.
- मात्र तृणमूल काँग्रेसने आज हे पत्रं मीडियासमोर आणलं.
- तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
- देशातील लोकशाही धोक्यात आहे.
- त्यामुळे भाजपाविरोधात एकत्र या.
- देशात सूडाचं राजकारण सुरू आहे.
- त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, इन्कम टॅक्ससह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे.
- भाजपाच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
- तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे.
- या बैठकीतल पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे.
शरद पवारांना मिळाले ममता बॅनर्जींचं पत्रं
- ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्रं लिहिलं आहे.
- पवारांनीही ममता बॅनर्जी यांचं पत्रं मिळाल्याचं सांगितलं आहे.
- आम्ही लवकरच एक बैठक घेणार आहोत, असेही पवार म्हणाले.
- ही बैठक दिल्ली किंवा मुंबई दोन्हीपैकी एका ठिकाणी होईल.
- बैठकीची तारीख अजून निश्चित नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.