Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय संस्थेच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

February 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
shelar

मुक्तपीठ टीम

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभा करण्यात याव्यात, असे आवाहन देशाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या अशा दोन संस्था उभ्या करण्याबाबत शासन म्हणून पुढाकार घ्यावा अशी विनंती करणारे पत्र भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

 

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मभूमीत होते आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी भाषेतील योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यापूर्वी मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण संस्था उभ्या राहिलास  भाषेचा आणि महाराष्ट्राचा सन्मानच होईल. त्यासोबतच महाराष्ट्राचा ७५ वा वर्धापन दिन आपण ज्यावेळी साजरा करू त्यापूर्वी या दोन संस्था उभा राहिल्यास मराठी भाषेला एक वेगळा आयाम मिळू शकेल.

 

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मातृभाषेचा सन्मान प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्याने केलेले हे आव्हान एका अर्थी एक मोठी संधी आहे. त्यामुळे तातडीने या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत याबाबतही तातडीने केंद्र सरकारशी संवाद साधणे आवश्यक आहे.

 

मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेय. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या करण्यासाठी पुढाकर घ्यावा!
-मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती. pic.twitter.com/4Fij513Wza

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021

 

मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग हा एक विकासाचा महामार्ग वेगाने उभा राहतो आहे या महामार्गाच्या लगत काही जागा राज्य सरकारने विविध व्यावसायिक उपयोगासाठी निश्चित केल्या आहेत जर अशा प्रकारच्या दोन संस्था या महामार्गाच्या लगत संरक्षित जागेवर उभा राहिल्यास या संस्थानसाठी लागणारी जागा ही तातडीने उपलब्ध होऊ शकेल व कनेक्टिविटी राहू शकेल.

 

व्हीजेटीआय, आयआयटी या सारख्या नामांकित संस्थांशी समन्वय साधून संलग्न करून तसेच केईएम, जे. जे. यासारख्या वैद्यकीय संस्थांशी संलग्न करून या संस्था मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी उभे राहिल्यास भविष्यात मराठीतून अभियांत्रिकी आणि  वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीच्या हातून मराठीची सेवा घडेल.

 

मातृभाषा ही “ज्ञानभाषा” आणि “व्यवहार भाषा” व्हावी यादृष्टीने पंतप्रधानांनी केलेले हे आव्हान महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने उपाय योजना करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच या बाबत एक अभ्यास गट तातडीने नियुक्त करून जागतिक पातळीच्या आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या संस्था उभ्या करुन मराठी भाषेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल सरकारने उचलावे ही विनंती अँड आशिष शेलार यांनी या पत्रात केली आहे.


Tags: bjp ashish shelarPM Narendra modiअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनआमदार अँड आशिष शेलारपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्र
Previous Post

रिपब्लिकन पार्टीचे गरिबी हटाव! भूमिहीनांना जमिनीसाठी आंदोलन करणार!!

Next Post

‘या’ चित्रपटामुळे महाराष्ट्र-बांग्लादेशातील सांस्कृतिक संबंध होणार दृढ

Next Post
amit deshmukh

‘या’ चित्रपटामुळे महाराष्ट्र-बांग्लादेशातील सांस्कृतिक संबंध होणार दृढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!