मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना उद्रेकाला थोपवण्यासाठी आज राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यासाठी नवीन निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार २२ एप्रिल म्हणजेच गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. १ मेच्या सकाळी सातपर्यंत हे लॉकडाऊन लागू असेल. मुंबईत सामान्य नागरिकांना लोकल, मेट्रो आणि मोनोतून प्रवास करता येणार नाही. ती मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच असेल.
- गुरुवार, २२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मेच्या सकाळी ७पर्यंत हे आदेश लागू राहतील
- सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सध्याची ५० % उपस्थिती घटवून ती केवळ १५ % करण्यात आली आहे.
- कोरोना नियंत्रणासाठी अत्यावश्यक सेवेला सूट असेल.
- अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र १३ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या संख्येने कार्यरत राहता येईल.
- सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील
- खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५०% प्रवाशांना परवानगी
- सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.
- अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे.
- मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
- लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
- परंतु लग्नासाठी फक्त २ तासांची वेळमर्यादा दिलेली आहे.
- तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.
- जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
- खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.
- नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
- खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच असणार आहे.
- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी असणार आहे.
- सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार आहे.
- अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा असेल.
गुरुवार, २२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मेच्या सकाळी ७पर्यंत हे आदेश लागू राहतील