मुक्तपीठ टीम
सुप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल द लॅंसेटच्या संपादकीयात भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या सध्याच्या संकटासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. जर्नलच्या मते, भारत सरकारने केवळ धार्मिक आणि राजकीय सभांसारख्या ‘सुपरस्प्रेडर’ कार्यक्रमांनाच फक्त परवानगी दिली नाही, तर देशातील लस मोहिमही घटत गेली आहे.
लँसेट संपादकीयात दाखवलेले मोदी सरकारच्या चुका
- सुपरस्प्रेडर्स कार्यक्रमांबद्दलच्या धोक्याबद्दल इशारा देऊनही सरकारने धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली, ज्यात देशातील कोट्यवधी लोकांनी भाग घेतला.
- मोठ्या निवडणूक जाहीर सभा घेण्यात आल्या, ज्यामध्ये कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आणि मोठी समस्या निर्माण झाली. इतकेच नाही तर कोरोना देशात कमी होत आहे, असा चुकीचा संदेश देण्यात आला होता.
- भारतात लसीकरणाची मोहिमही मंदावली आहे.
- सरकारने कोरोनाच्या दुसर्या लाटेविषयीच्या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले.
- दुसर्या लाटेमुळे कोरोना प्रकरणातील दुसरी लाट वाढण्याआधी मार्च महिन्यात भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते की, भारतात कोरोना संपुष्टात येत आहेत.
- दुसर्या लाटेबाबत अनेकदा इशारा मिळाला असला तरी सरकारने मात्र कोरोनाला पराभूत केले अशी प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न केला.
लॅंसेटमध्ये छापलेल्या या संपादकीयाशी भारतातील वैद्यकीय तज्ज्ञही सहमत आहेत. त्यांच्या मते भारत संकटात सापडला आहे, त्याची जबाबदारी सरकारने घेतलीच पाहिजे.
कोरोनाची भारतातील भयावहता
- भारतात सतत पाचव्या दिवशी कोरोनाच्या ४ लाखांहून अधिक नवीन रूग्णसंख्या नोंदवली गेली असतानाच लँसेट या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिक मासिकाचे संपादकीय आल्याने, त्याचे वेगळे महत्व आहे.
- देशात शनिवारी कोरोनाचे ४ लाख ३ हजार १९६ नवीन रुग्ण आढळले.
- संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढून २ कोटी २२ लाख ८९ हजार ४५२ झाली आहे.
- कोरोनामुळे आतापर्यंत भारतातल्या २ लाख ४२ हजार २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.