Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#ग्रामयुद्ध काही गावांमध्ये मोठ्या नेत्यांना मोठा धक्का!

गावच्या मतदारांचा अनेक प्रस्थापितांना हादरवणारा कौल

January 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
Grampanchayat election -1

मुक्तपीठ टीम

ग्रामपंचायती म्हणजे राजकारणाचे केजी वर्ग. प्रथमच या केजी वर्गाच्या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. गावागावातील राजकारणाचा कल स्पष्ट करणाऱ्या या निवडणुकांच्या ग्रामयुद्धामध्ये अनेक गावांमधील मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. वर्षानुवर्षेच नाही तर दशकानुदशकेही असलेली काही गावांमधील मोठ्या नेत्यांची सत्ता मतदारांनी उलथून लावली आहे. आणि त्यांच्या विरोधात कौल दिला आहे. यात सर्वात मोठे नाव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आहे. त्यांच्या गावात शिवसेनेने भगवा फडकवला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने विजयी मुसंडी मारली आहे. हा मोठा धक्का मानला जातो आहे. त्यांनी सर्व प्रयत्न करुनही कमळ कोमेजलेले आहे.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघातील चार ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव झाला आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विजय मिळाला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटलांना त्यांच्या गावातच धक्का बसला आहे. त्यांच्या पॅनलचा प्रथमच धुव्वा उडाला आहे. असाच धक्का पृथ्वीराज चव्हाणांना कराडात बसला आहे. तिथे भाजपच्या अतुल भोसले यांनी अनेक गावांमध्ये कमळ फुलवले आहे. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विजय सिंह मोहिते पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्यात चुरस सुरु आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या बळावर भाजपने शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेला धक्का बसला आहे. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार दोन्ही पक्षांना समसमान वाटा मिळेल असे दिसत आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीत माजी सभापती राजू परब यांचा करिष्मा चालला आहे. सात जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता मिळवली आहे.

भाजप आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत त्यांच्याकडून शिवसेनेने खेचून घेतली आहे. तर राजापुरातील ग्रामपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला आहे.

साताऱ्यातील पाटणमध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी भगवा फडकवला असून तिथे राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला फटका बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सासुरवाडीचे गाव असणाऱ्या सांगलीतील म्हैसाळ गावात राष्ट्रवादीचे घड्याळ चालले नाही. पाटील यांचे मेव्हणे राऊळे उभे असलेल्या पॅनलचा धुव्वा उडवत भाजपनं बाजी मारली आहे.


Tags: grampanchayat electionsgrampanchayat resultsgramyuddhmaharashtra village panchayat resultsग्रामपंचायत निकालग्रामपंचायत निवडणूकग्रामयुद्धमहाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल
Previous Post

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मृत्यूसत्र सुरूच, आतापर्यंत १५ शेतकऱ्यांचा मृत्यू

Next Post

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

Next Post
Farmer Tractor parade -1 (2)

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!