Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यपाल मलिकांचा भाजपाला सल्ला…किमान हमी दरासाठी कायदा बनवा! शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल!!

October 18, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
governor satya pal malik

मुक्तपीठ टीम

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडली आहे. मलिक यांनी केंद्र सरकारने किमान हमी दरासाठी कायदा बनवा. एमएसपी कायदा लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न नक्कीच सुटेल, असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. राजस्थानातील झुंझुनू दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारशीसुद्धा लढाई लढली आहे. किमान हमी दर म्हणजेच एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचं ऐकलं पाहिजे. एमएसपी लागू होईल तेव्हा शेतकऱ्यांचे आंदोलन आपोआप संपेल.

 

काय म्हणाले मलिक?

  • केंद्राने एमएसपीची हमी देण्यासाठी कायदा करावा.
  • त्यानंतर शेतकर्‍यांचा प्रश्न नक्कीच सुटेल.
  • देशातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.
  • केंद्र निश्चितच चुकीच्या मार्गावर आहे.
  • केंद्र सरकारने हे समजून घेतले पाहिजे की शेतकरी १० महिने आपली घरे, कुटुंबे सोडून रस्त्यावर बसले आहेत.
  • एवढे मोठे आंदोलन होऊनही सरकार काहीच पावले उचलत नसल्यामुळे शेतकरी संतापले आहे.
  • ही परिस्थिती अशीच राहिली तर केंद्र सरकार पुन्हा निवडून येणार नाही.
  • केंद्र सरकारभोवती चुकीचे सल्ला देणारे लोक आहेत. त्यांच्यामुळेच सत्याचा नाश होत आहे.

 

मी शेतकरी आंदोलनात मध्यस्थी करण्यास तयार

  • मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि गरज पडल्यास मी राज्यपाल हे पद सोडू शकतो.
  • मी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना लढा दिला आहे.
  • मी त्यांना सांगितले की हे सर्व करू नका.
  • जर कोणी मला आंदोलनात मध्यस्थी करण्यास सांगितले तर मी त्यासाठी तयार आहे.
  • शेतकऱ्यांनी मला मध्यस्थ म्हणून स्वीकारले आहे, पण सरकारनेही मध्यस्थी मागितली तर प्रकरण मिटेल.

 

लखीमपूर घटनेनंतर अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यायलाच हवा!

  • लखीमपूर प्रकरणात मलिक म्हणाले की, ही घटना घडताच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यायला हवा होता.
  • ते म्हणाले की, अजय मिश्रा गृह राज्यमंत्री होण्यासाठी योग्य नाहीत.

 

कोण आहेत राज्यपाल मलिक

  • मलिक हे उत्तर प्रदेशचे आहेत.
  • सत्यपाल यांनी मेरठ विद्यापीठातून बीएससी आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.
  • ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
  • मलिक जम्मू -काश्मीरचे राज्यपालही राहिले आहेत.
  • जेव्हा ते काश्मीरचे राज्यपाल होते तेव्हा तेथील दहशतवाद बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता.
  • त्यांच्या कार्यकाळादरम्यान कलम ३७० काढून टाकण्यात आले आणि या मध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
  • २५ ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमधून त्यांची बदली करून त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती.

Tags: BJPFarmers protestgovernor satya pal maliklakhimpurMSPअजय मिश्राएमएसपीकिमान हमी दरलखीमपूर
Previous Post

आर्यन खानला अटक झालेल्या मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचे बिहार कनेक्शन!

Next Post

मुंबईत का होत आहे प्रचंड उकाडा? संशोधकांचा अभ्यास सांगतो फक्त ग्लोबल वार्मिंग नाही, ‘हे’ही आहे कारण…

Next Post
Mumbai

मुंबईत का होत आहे प्रचंड उकाडा? संशोधकांचा अभ्यास सांगतो फक्त ग्लोबल वार्मिंग नाही, ‘हे’ही आहे कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!