Friday, May 30, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपाल कोश्यारी : “शिवाजी महाराज तर जुने झाले…!” वाचा या आधीचीही वादग्रस्त विधानं…

November 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Governor BhagatSingh Koshyari (2)

मुक्तपीठ टीम

राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्राची आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. आजच्या नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.

समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?

  • यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त बोलले होते.
  • औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं.
  • महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले.
  • चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?
  • मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.
  • प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं.
  • शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.
  • त्यांच्या विधानावरुनही राज्यात गदारोळ झाला होता.

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य!!

  • भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता.
  • त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सावित्री बाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं.
  • कल्पना करा ही लहान मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?असं वक्तव्य कोश्यारींनी केलं.
  • पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.

नेहरूंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेमुळे भारत कमकुवत

  • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे.
  • त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला,” असंही विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.

गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही..

  • “राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही, तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली.
  • हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे.
  • हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो.
  • महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही.
  • मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही

Tags: bhagat singh koshyariControversial StatementMaharashtraगुजरातीछत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्रराजस्थानीराज्यपाल भगत सिंग कोश्यारीवादग्रस्त विधानंसावित्रीबाई फुले
Previous Post

अॅपल यूजर्ससाठी गुड न्यूज, भारतात आयफोनसाठी 5Gचे iOS 16 बीटा सॉफ्टवेअर अपडेट!

Next Post

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२: अर्ज करण्याची आणखी एक संधी, ३० नोव्हेंबर अंतिम तारीख

Next Post
CBSE Single Girl Child Scholarship

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२: अर्ज करण्याची आणखी एक संधी, ३० नोव्हेंबर अंतिम तारीख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!