Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शेतकऱ्यांचा भारत बंद! दिल्लीसह उत्तरेतील राज्यांमध्ये प्रभाव!

September 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
farmers protest

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. या भारत बंदमुळे दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 

या बंदला दिल्ली सरकारसह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणात आपलं आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीच्या गाझीपूर, शंभू सीमांवर शेतकऱ्यांनी ठाम मांडायला सुरुवात केली आहे. दिल्ली – अमृतसर, दिल्ली – अंबाला यांसहीत अनेक रस्त्यांवर चक्का जाम करण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांनी दिल्ली-जम्मू रेल्वे मार्गावरील पठाणकोट रेल्वे कॅन्ट स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंगच्या मध्यभागी ट्रॅक्टर उभे केले आहेत. जम्मू-जालंधर बायपास आणि पंजाब-हिमाचल सीमेवरील दमताल येथे प्रचंड ट्रॉली उभारून राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे.

 

हरियाणाच्या सोनपत येथील गणौर येथील भारतीय आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बाजारासमोर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ रोखला आहे. आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बाजारामध्ये शेतकऱ्यांसाठी लंगरचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर चंदीगडहून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकण्यात आले आहेत.

 

कृषी कायद्यांच्या विरोधात गाझीपूर सीमेवर निदर्शने केली जात आहेत. संयुक्त किसान मोर्चाने सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत बंदची घोषणा केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रचंड वाहतूक कोंडी आहे.

 

हरियाणाच्या फतेहगढ येथील शेतकरी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहेत आणि रेल्वे ट्रॅकवर उभे राहून विरोध करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावर ‘भारत बंद’मुळे आंदोलकांनी रोहतक, हरियाणामध्ये राज्य महामार्ग रोखला आहे.

 

कृषीमंत्र्यांचे चर्चेसाठी आवाहन

  • २७ सप्टेंबरच्या भारत बंदची शेतकऱ्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
  • दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
  • तोमर यांनी रविवारी सांगितले की, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर सरकार विचार करण्यास तयार आहे.
  • यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत.
  • यानंतरही, त्यांना जर काही समस्या असेल तर सरकार निश्चितपणे याबद्दल चर्चा करेल.

 

या पक्षांचा पाठिंबा

  • काँग्रेस
  • आरजेडी
  • आम आदमी पार्टी
  • मायावतींचा बहुजन समाज पक्ष
  • समाजवादी पक्ष
  • डाव्या पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

Tags: Bharat BandCongressFarmers protestharyanamayawatinarendra tomarnorth indiaआम आदमी पार्टीकृषी कायदेसंयुक्त किसान मोर्चा
Previous Post

प. महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याकडे वळवणार!

Next Post

“जनतेचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करा”!

Next Post
chhagan bhulbal

"जनतेचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करा"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!