Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

करोनाकाळात १५% शुल्क कपातीच्या निर्णयाची शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी नाही! पालकांच्या पदरी निराशा!!

December 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

करोनाकाळात आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना खासगी शाळांनी १५ शुल्क कपात द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ०३/०५/२०२१ रोजी महाराष्ट्रातील शिक्षण विभागास दिला होता. काटेकोर अंमलबजावणी साठी शिक्षण विभागाने अध्यादेश काढणे गरजेचे असताना, शिक्षण विभागाने १२/०८/२०२२ रोजी शासन आदेश पारीत केले त्यातही शुल्क कपातीचे शैक्षणिक वर्ष चुकीचे टाकले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी १५% शुल्क कपात करावी असे म्हटले असताना शिक्षण विभागाने शासन आदेशात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ असे नमूद करुन मोठा घोळ घातला, या शासन आदेशाला काही ठराविक शाळांनी स्वतः पुरता स्थगिती मिळवली, पण महाराष्ट्रातील सर्वच शाळांनी या शासनाचे आदेशाचे पालन केले नाही आणि सर्व पालक १५% शुल्क कपाती पासून वंचित राहिले, या मुळे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी शिक्षक महासंघाचे व आप नेते नितीन दळवी व महासंघाचे प्रसाद तुळसकर यांना या शासन आदेशाच्या अंमलबजावणी साठी शिक्षण खात्याशी पत्राद्वारे पाठपुरावा सुरू केल्यावर शिक्षण खात्याने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांना अंमलबजावणी साठी पत्र पाठविले व उपसंचालकांनी २२/०४/२०२२ रोजी मुंबईतील सर्व शिक्षण निरिक्षक तसेच सर्व शिक्षणाधिकारी ठाणे/रायगड/पालघर यांना १५% शुल्क कपातीच्या शासन आदेशाची अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले.

rti_reply_education_१५percent_gr_implement

या निर्देशाच्या अंमलबजावणीच्या माहिती साठी नितीन दळवी यांनी उपसंचालक कार्यालयात माहितीचा अधिकार दाखल केल्यावर उपसंचालक कार्यालयाने १४/०९/२०२२ पाठविलेल्या पत्रावरून मिळालेल्या माहिती वरुन असे निदर्शनास आले कि मुंबईतील सर्व शिक्षण निरिक्षक व ठाणे/रायगड/पालघर च्या शिक्षणाधिकारी यांनी शासन आदेशाचे अनुपालनच केले नाहिच पण कुठला अहवाल हि सादर केला नाही तसेच काही विशिष्ट शाळांना जी स्थगिती मिळाली होती त्याचे कारण उपसंचालक कार्यालयाने पुढे केले. महासंघाचा सवाल आहे कि ठराविक शाळांना स्थगिती मिळाली होती पण ज्या शाळांना स्थगिती मिळाली नाही अशा शाळांबरोबर अंमलबजावणी साठी कुठल्याही शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांनी काहिच पाऊले उचलली नाहीत, या वरुन असे निदर्शनास येते कि सरकार, शिक्षण खात्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शुल्क कपातीच्या आदेशाचे पालनच करायचे नव्हते म्हणूनच शासन आदेशात चुकिच्या शैक्षणिक वर्षाचा उल्लेख करुन घोळ घालण्यात आला व यामुळे काहि शाळांना स्थगिती घेण्याचा वाव देण्यात आला तसेच बहुसंख्य शाळा ज्यांना स्थगिती मिळाली नव्हती अशा शाळांकडून अंमलबजावणी करण्यासाठी उपसंचालक, निरीक्षक, शिक्षणाधिकारी यांनी काहिच पाऊले उचलली नाही, या सर्व प्रकारावरून असे निदर्शनास येते कि खाजगी शाळांना १५% शुल्क कपातीपासुन वाचण्यासाठी शिक्षण खात्या कडून अभय देण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व पालकांच्या तोंडाला १५% शुल्क सवलतीची पाने पुसणयात आली याला अगोदरच्या सरकार सोबत आताचे सरकार हि जबाबदार आहे,या मुळे पालकांना न्याय मिळाला नाही, महाराष्ट्रातील पालक शिक्षण खात्याच्या या प्रकारामुळे अक्षरश भरडला गेला, पालकांना न्याय देण्यासाठी शिक्षण खात्याची ईच्छाशक्ती नाही, यामुळे महाराष्ट्रातील पालक संतप्त आहे व पालकांच्या पदरी निराशा पडल्यामुळे पालकांमध्ये असंतोष आहे.

reply_dyde_non_implementation_१५percent

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी, पालक, शिक्षक महासंघाचे प्रसाद तुळसकर यांनी पालकांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


Tags: aapFee DeductionMaharashtra govtNitin Dalviशुल्क कपाती
Previous Post

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदांवर १०० जागांवर करिअर संधी

Next Post

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) च्या ऑनलाईन सिंगल विंडो पोर्टलचे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्घाटन

Next Post
Hon DCM launching MEDA single window web portal for renewable energy projects

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) च्या ऑनलाईन सिंगल विंडो पोर्टलचे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!