मुक्तपीठ टीम
देशात यंदा पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सत्ताधआरी शिवसेना पक्ष यंदा गोव्यातून ११ जागांसाठी निवडणुका लढवणार आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी सध्या राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या प्रचारात भाजपावर सडकून टीका केली आहे.
गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला…
- मागच्या काळात भाजपसोबत युती होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भावना होती.
- मित्राला धोका होऊ नये.
- हिंदू मतात फूट पडू नये आणि आपल्यामुळे मित्राला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो.
- त्या काळात इतर पक्ष वाढत गेले.
- आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले.
- खासदार आणि मंत्री झाले.
- तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नव्हतो.
- पण, गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला.
- आमच्याच नाही जे काही एनडीएचे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले.
- त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे.
गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार!
- उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लढत आहोत.
- मणिपूरमध्ये लढत आहोत.
- बिहार आणि बंगालमध्ये लढलो.
- सिल्वासामध्ये विजय मिळाला.
- आज गोव्यात लढत आहोत.
- जो काही आमचा जनतेशी कनेक्ट होता तो आहेच.
- तो फॉर्मली कनेक्ट करण्यासाठी आम्ही लढत आहोत.
- गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार आहोत.
आम्ही काम करण्यासाठी आलो,बोट दाखवण्यासाठी नाही!
- शिवसेनेचे वाघ असतात.
- आणि वाघांचा बाजार नसतो.
- आम्ही काम करण्यासाठी आलो आहोत.
- बोट दाखवण्यासाठी आलो नाही.
- क्रेडिटसाठी आलो नाही.