Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ऐ मेरे वतन के लोगों”: देशाच्या प्रत्येक पिढीचं मन हेलावतं…लतादीदींच्या गाण्यानं नेहरूंच्या डोळ्यात अश्रू, मोदींनीही काढली आठवण!

February 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
lata mangeshkar songs

रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम

भारताच्या सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांचे निधन म्हणजे नक्कीच देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. १९४२पासून प्रत्येक पिढीला आपल्या आवाजानं जिंकून घेणाऱ्या लतादीदींच्या एका गाण्याचा उल्लेख हा प्रत्येक भारतीय अभिमानाने करतो. ते गाणं म्हणजे “ऐ मेरे वतन के लोगों”. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या गाण्याचा लतादीदींच्या निधनानंतर खास उल्लेख केला. पण तेच नाही, लतादीदींनी हे गाणं लाइव्ह सादर केलं तेव्हाही तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तेच नाही तर तेव्हापासून प्रत्येक पिढीतील भारतीयांना हेलावणारं आणि सैनिक आणि देशप्रेम जागवणारं असं हे गाणं आहे.

 

“ए मेरे वतन के लोगों, तू खूब लगा लो नारा।” हे गाणे खरे तर भारत-चीन युद्धात दुखावलेल्या भारताला समर्पित होते, ज्याने संपूर्ण देश हादरला होता. ज्या वेळी लता मंगेशकरांनी हे गाणे गायले होते, त्यावेळचे वातावरण अतिशय उदास होते. २६ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी हे गाणे गायले होते. त्यावेळी भारत-चीन युद्ध संपून फारच कमी अवधी झाला होता. हे गाणे प्रसिद्ध गीतकार प्रदीप यांनी लिहिले असून सी रामचंद्रन यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यानंतर कवी प्रदीप म्हणाले की, या गाण्याला लतादीदीच न्याय देऊ शकतात.

 

लतादीदींचे हे गाणे गाऊन झाल्यावर पंडित नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले. हे गाणे ऐकून ते स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी लतादीदींना पुन्हा एकदा हे गाणे गाण्यास सांगितले. त्यांच्या विनंतीवरून लतादीदींनी हे गाणे पुन्हा गायले.

 

अर्थात लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांमध्ये डोळ्यात पाणी आणणारे हे एकमेव गाणे नव्हते तर अनेक गाणी अशी होती. लतादीदी जेव्हा गाणे रेकॉर्ड करायच्या तेव्हा त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजत त्यात जीव ओतत. त्यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये काही उणिवा सापडत नाहीत.

 

नक्की वाचा कवी प्रदीप यांचं ते गाणं..

 

हेही वाचा:

“ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा ‘ते’ गाणं…


Tags: Ai Mere Watan Ke LogoFormer Prime Minister Pandit Jawaharlal Nehruindianlata mangeshkarlata mangeshkar songsLatadidimuktpeethPrime Minister Modiऐ मेरे वतन के लोगोपंतप्रधान मोदीभारत सम्राज्ञी लता मंगेशकरमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूमुक्तपीठलतादीदी
Previous Post

“ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा ‘ते’ गाणं…

Next Post

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Next Post
Lata Mangeshkar death 2 days state mourning, public holiday on monday in maharashtra

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!