औरंगाबाद शहरातील पोलीस ठाणी अत्याधुनिक करून त्यांचा दर्जा वाढवण्यात येणाराय. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस ठाण्यांना भेट देऊन त्यांचा कायापालट करण्याचा निर्णय अत्याधुनिक करून त्यांचा दर्जा वाढवण्याचा निर्णय घेतला.
पदभार स्वीकारल्यापासून गुप्ता यांनी अनेक पोलीस ठाणे आणि चौकींना अचानक भेटी दिल्या. शहरातील काही चौक्या अगदी निजाम काळापासूनच्या जुनाट अवस्थेत आहेत. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांची मॅरेथॉन चर्चा झाली. सर्वप्रथम, दिल्ली गेट आणि मध्यवर्ती बसस्थानकासह शहरातील अनेक पोलीस चौक्यांपैकी चार चौक्यांचे नुतनीकरण केले जाईल.
अनेक चौक्यांमध्ये शौचालय आणि विश्रांती घेण्यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. पोलिस ठाणे तुलनेने चांगल्या स्थितीत आहेत. मंगळवारी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता निवडणूक तयारीच्या बैठकीतून परतत असताना, ऐतिहासिक शहरातील सर्वात जुनी चौकीच्या येथे ते थांबले, आणि त्याची तरासणी केली.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध मोक्याच्या ठिकाणी अनेक नवीन पोलिस चौक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रवेश आणि एक्झिट पॉइंट्स, संवेदनशील स्थाने तसेच शहरातील व्यावसायिक, पर्यटन आणि प्रशासकीय महत्त्व असलेल्या ठिकाणी नवीन पोलिस चौक्या असतील.








Subscribe