Tuesday, May 20, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राजभवन X विधानभवन: सहकारी कायदा सुधारणा विधेयक राज्यपालांनी परत का पाठवले?

March 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Bhagat Singh Koshyari

मुक्तपीठ टीम

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि आघाडी सरकार यांच्यातील शीतयुद्ध आता उघड संघर्षात बदलले आहे. बारा आमदारांची नियुक्ती तशीच पडून असतानाच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार वाद भडकवणारे ठरलेले आहेत. हे सारं सुरु असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी आघाडी सरकारला नवा धक्का दिला आहे.
आघाडी सरकारचे सहकार कायदा सुधारणा विधेयक राज्यपालांनी फेरविचारार्थ परत पाठवले आहे. कोश्यारी यांनी या विधेयकामधील कलम १५७ च्या सुधारणेवर फेरविचार करण्याची सूचना करीत राज्यपालांनी हे विधेयक परत पाठविले आहे. या कलमाद्वारे आघाडीतील पक्षांना सहकारावर राजकीय वर्चस्व वाढवण्याची संधी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

आघाडी सरकारची सहकार कायद्यातील सुधारणा

  • केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकारने २०१३ मध्ये सहकार कायद्याच्या विविध कलमांत सुधारणा केल्या होत्या.
  • मात्र, काही महिन्यांपूर्वी या घटनादुरुस्तीतील काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या.
  • त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा सहकार कायद्यात बदल करीत १० वर्षांपूर्वीचे नियम पुन्हा अमलात आणण्याचा निर्णय घेतला.
  • त्यानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहकारी संस्थांच्या कामकाजात सुलभता आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या विविध कलमांत सुधारणा करण्यात आली.

विरोधी पक्षनेते फडणवीसांकडून सहकारावर कब्ज्याच्या प्रयत्नाचा आरोप

  • हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात हे विधेयक मंजूर होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या तरतुदीस आक्षेप घेतला होता.
  • या सुधारणांच्या माध्यमातून सरकारने पुन्हा सहकारावर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
  • त्यानुसार १० वर्षांपूर्वी राज्य सरकारनेही सहकार कायद्यात सुधारणा करीत सहकारी संस्थांमध्ये सरसकट हस्तक्षेप करण्याचा सरकारचा अधिकार कमी केला होता.
  • मात्र,विरोधकांनी विधानसभेत हे विधेयक रोखण्याचा प्रयत्न केला होता.
  • सरकारने मात्र बहुमताने हे विधेयक मंजूर करून राज्यपालांकडे पाठविले होते.
  • कोश्यारी यांनी या विधेयकामधील कलम १५७ च्या सुधारणेवर फेरविचार करण्याची सूचना करीत राज्यपालांनी हे विधेयक परत पाठविले आहे.

 

राज्यपासांनी परत पाठवलेले विधेयक आता अधिवेशनात मंजूर करण्यात येणार

  • राज्यपालांनी विधिमंडळाकडे फेरविचारार्थ पाठविलेले विधेयक पु्न्हा याच अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे.
  • तसे करताना त्या विधेयकात कोणत्याही सुधारणा केल्या जाणार नाहीत.

 

राज्यपालांनी परत पाठवलेल्या विधेयकाचं पुढे काय होतं?

  • विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाते.
  • राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होते.
  • घटनेतील अनुच्छेद २००नुसार विधिमंडळाने मंजूर केलेलं विधेयक राज्यपाल फेरविचारार्थ विधिमंडळाकडे पुन्हा पाठवू शकतात.
  • विधिमंडळ आहे त्याच स्वरुपात किंवा बदल करून विधेयक मंजूर करू शकते.
  • त्यानंतर राज्यपालांना विधेयकाला संमती द्यावीच लागते.
  • तरीही या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कायदेशीर त्रुटी उद्भवू शकतात, असे राज्यपालांचे मत झाल्यास ते विधेयक राज्यपाल हे राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात शकतात.

Tags: bhagat singh koshyariMVAदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रमहाविकास आघाडीराज्यपाल भगत सिंग कोश्यारीविधीमंडळसहकारी कायदा सुधारणा विधेयक
Previous Post

कूपरेज बँडस्टँड येथे रंगणार एनसीपीए अॅट दी पार्क संगीत व कला महोत्सव

Next Post

पोलीस आयुक्तांशी संपर्क साधायचा आहे? ९८६९७०२७४७वर एसएमएस, व्हॉट्सअॅप करा! फेसबुकवरही आहेत!!

Next Post
Sanjay Pandey

पोलीस आयुक्तांशी संपर्क साधायचा आहे? ९८६९७०२७४७वर एसएमएस, व्हॉट्सअॅप करा! फेसबुकवरही आहेत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!