Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?

September 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
pm narendra modi

मुक्तपीठ टीम

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याची मोठी घडामोड दुपारी झाली असताना गुजरात हेच गृहराज्य असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी मांडलेले विचार खास उल्लेखनीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात गुजरातचं महत्व मांडले आहे. विजय रुपाणींच्या राजीनाम्यासाठी ज्या पाटीदार समाजाच्या नाराजीचे कारण सांगितले जाते, त्या पाटीदार समाजाचीच मोदींनी भरभरून प्रशंसा केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे कोणते?

गरवी गुजरातचा गौरव…

  • गुजरात पूर्वीपासून आजपर्यंत सामायिक प्रयत्नांची भूमी आहे.
  • स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींनी येथून दांडी यात्रा सुरू केली, जी आजही देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे.
  • त्याचप्रमाणे सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली खेडा चळवळीत शेतकरी, तरुण आणि गरीबांच्या एकतेने ब्रिटिश सरकारला झुकायला भाग पाडले.
  • ती प्रेरणा, ती ऊर्जा आजही आपल्यासमोर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, गुजरातच्या मातीवर सरदार साहेबांचा गगनचुंबी पुतळा या स्वरूपात उभी आहे.

 

गुजरात तो अतीत से लेकर आज तक साझा प्रयासों की ही धरती रही है।

आजादी की लड़ाई में गांधी जी ने यहीं से दांडी यात्रा की शुरुआत की थी, जो आज भी आज़ादी के लिए देश के एकजुट प्रयासों का प्रतीक है: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) September 11, 2021

 

नाराज पाटीदार समाजाचं कौतुक

  • पाटीदार समाज ही त्याची ओळख राहिली आहे, ते जिथे जातात तिथे तिथल्या व्यवसायाला नवी ओळख देतात.
  • आपले हे कौशल्य आता केवळ गुजरात आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ओळखले जात आहे.
  • पाटीदार समाजाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य आहे, जेथे असेल तिथे, भारताचे हित तुमच्यासाठी सर्वोच्च आहे.

 

इसी तरह, खेड़ा आंदोलन में सरदार पटेल के नेतृत्व में किसान, नौजवान, गरीब एकजुटता ने अंग्रेजी हुकूमत को झुकने पर मजबूर कर दिया था।

वो प्रेरणा, वो ऊर्जा आज भी गुजरात की धरती पर सरदार साहब की गगनचुंबी प्रतिमा, ‘स्टेचू ऑफ यूनिटी’ के रूप में हमारे सामने खड़ी है: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) September 11, 2021

 

समाजातील सर्वच वंचितांचा खास उल्लेख

  • समाजातील त्या घटकांना, जे मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
  • आज एकीकडे दलितांच्या आणि मागासांच्या हक्कांसाठी काम केले जात आहे, दुसरीकडे आर्थिक आधारावर मागासलेल्या लोकांना १०% आरक्षण देण्यात आले आहे.

 

पाटीदार समाज की तो पहचान ही रही है, ये जहां कहीं भी जाते हैं वहाँ के व्यापार को नई पहचान दे देते हैं।

आपका ये हुनर अब गुजरात और देश में ही नहीं, पूरी दुनिया में पहचाना जाने लगा है।

पाटीदार समाज की एक और भी बड़ी खूबी है, ये कहीं भी रहें, भारत का हित आपके लिए सर्वोपरि रहता है: PM

— PMO India (@PMOIndia) September 11, 2021

 

सरदारधामविषयी ग्लोबल प्रशंसा

  • सरदारधामचे उद्घाटन ११ सप्टेंबरला म्हणजेच ९/११ रोजी झाले आहे. ही तारीख जितकी महत्त्वाची आहे तितकीच त्याच्याशी निगडित संदेश आहे.
  • ही तारीख एकीकडे मानवतेवर हल्ला करण्यासाठी ओळखली जाते, तर दुसरीकडे, या तारखेला स्वामी विवेकानंदांनी जगाला भारताच्या मानवी मूल्यांची ओळख करून दिली.
  • गुजरात पूर्वीपासून आजपर्यंत सामायिक प्रयत्नांची भूमी आहे. कोण विसरू शकतो, जेव्हा गुजरातने स्टॅच्यू ऑफ युनिटीची कल्पना मांडली, तेव्हा संपूर्ण देश या प्रयत्नांचा एक भाग कसा बनला.
  • हा पुतळा आज संपूर्ण देशाच्या एकजुटीचे आणि एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे.
  • सरदारधाम ट्रस्ट शिक्षण आणि कौशल्यांवर खूप भर देत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातही आपले शिक्षण कौशल्य वाढविणारे असावे याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, संघटनेत काम करण्याची इच्छा! खरं कारण काय?


Tags: BJPGujaratPM Narendra modivijay rupaniगुजरात
Previous Post

“अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे करा”: विजय वडेट्टीवार

Next Post

“साकीनाक्याच्या नराधमाला सोडणार नाही”, खटला जलदगती न्यायालयात!: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Maha CM

“साकीनाक्याच्या नराधमाला सोडणार नाही”, खटला जलदगती न्यायालयात!: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!