Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका!

विश्वास नांगरे पाटील

February 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
vishwas nagre patil

मुंबई प्रतिनिधी सुषेण नरे

समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे आणि शिक्षकांमुळे समाजात चांगुलपणा आजपर्यंत टिकून आहे,  म्हणून मी नेहमी माझ्या शिक्षकांचा आदर करतो, असे प्रतिपादन मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिक्षक भारती आयोजित स्नेहसंमेलनात मांडले. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करणाऱ्याची संधी मिळाली आहे, ही भावना ठेवून मी तत्परतेने काम करण्यास प्राधान्य देतो. विद्यार्थी-शिक्षक हे एकमेव असे नाते आहे, की ज्या नात्यात विद्यार्थ्याच्या उत्तरोत्तर प्रगतीत शिक्षकाला अभिमान वाटतो. तो आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा द्वेष न करता माझ्यापेक्षा जास्त प्रगती माझ्या विद्यार्थ्यांने करावी अशी अपेक्षा करतो. आजच्या पुरस्कार सोहळयात बालरक्षकाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करत त्यांनी शिक्षक भारती चांगलं काम करत असल्याचं उद्गार काढले, अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.

 

मुंबईत प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदीर येथे पार पाडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विश्वास नांगरे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनात महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांवर निवड झाल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेने आमदार कपिल पाटील यांचा विशेष सत्कार केला. कोरोना कालावधीत काम करणारे संस्थाचालक, मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक, बालरक्षक, व्हिडिओ निर्मिती /ई बुक निर्मिती / समुपदेशन करणाऱ्या शिक्षिकांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक भारतीच्या मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांचा बालरक्षक पुरस्कार देऊन विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 

snehsamelan

 

मुंबईतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांच्या वतीने मुंबईतील शाळा तातडीने सुरु करण्याची मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी यावेळी बोलताना केली. मुंबईतील शिक्षकांचा शाळा सुरु करण्याला विरोध नसून दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी करुन घेण्यासाठी शाळा उघडणे आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी मांडले.

 

मुंबईतील शिक्षकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता आमदार कपिल पाटील यांना निवडून दिल्याने ते सातत्याने शिक्षणाचे प्रश्न सभागृहात तडफेने मांडत आहेत. राज्यभर पदधवीधर व शिक्षक मतदार संघात धन दांडगे उमेदवार निवडून येत असताना मुंबईतील शिक्षकांनी मात्र आमदार कपिल पाटील यांना निवडून देऊन राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे, असं मत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी व्यक्त केले.

 

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विरोध केला पाहिजे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील, परिसरातील नागरिकांच्या सह्या गोळा करण्याचे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केले. शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर सरकारशी वेळ पडली तर दोन हात करायला मागे पडणार नाही. शिक्षणाचा हक्क आणि शिक्षकांचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी मी पुढेही अशीच पार पाडेन, अशी ग्वाही शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली.


Tags: IPS Officerravindra natya mandirvishwas nagre patilजालिंदर सरोदेसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
Previous Post

एक कंपनी अशी झकास…कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचा बोनस!

Next Post

सर्च इंजिनला नका समजू डॉक्टर…वाचा खऱ्या डॉक्टरांचा इशारा!

Next Post
Google health search trend

सर्च इंजिनला नका समजू डॉक्टर...वाचा खऱ्या डॉक्टरांचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!