Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home व्हा अभिव्यक्त!

#व्हाअभिव्यक्त! “ठाकरे सरकारने मराठवाड्याचा उगवला सूड”

भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा आरोप

January 28, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
mantralya-mumbai

– राम कुलकर्णी

 

मराठवाडयात सर्व जिल्हे आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात पिण्याच्या पाण्याचे अठराविश्व दारिद्र्य दूर व्हावे आणि सर्वांना मूबलक पाणी मिळावे. हे लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड योजना मंजूर केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणे पाईपलाईनद्वारे ऐकमेकांना जोडून दरी डोंगरात, वस्ती तळ्यांवर पाणी देणारी अभिनव योजना ठाकरे सरकारने जुजबी कारण दाखवत गुंडाळली असून कामाच्या निविदा थंड बसत्यात गुंडाळून ठेवल्या आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी सरकारने जनतेच्या तोंडी आलेले पाणी थांबवले हे मात्र नक्की. खर तर योजना रद्द करून ठाकरे सरकारने मराठवाडयातील सामान्य जनतेचा सूड घेतला.       

 

सरकार बदलल्यानंतर राजकीय द्वेषातून योजना ठाकरे सरकारने मागे टाकली. व्यवहार तपासण्याच्या नावाखाली अगदी वर्ष लोटले तरी गुंडाळून ठेवलेल्या निवीदा धुळ खात पडल्या. परिणामी सरकारने योजना गुंडाळून टाकली असे म्हटले तर वावगे नाही. फडणविस मुख्यमंत्री असतांना आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर त्या खात्याचे मंत्री असताना योजना मंजूर केली . इझायल कंपनीमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या योजनेचे जिल्हानिहाय टेंडर काढले होते. २० हजार कोटीपेक्षा अधिक खर्च मंजूर झाला होता . मराठवाड्यात एकूण ११ मोठी धरणे बंद जलवाहनीद्वारे ऐकमेकांना जोडून दुस्काळी भागात पाणीपुरवठा होईल असा अराखडा तयार झाला होता. या योजनेत १,३३० लांब मुख्य जलवाहनी आहे. ३,२२० किमी जलवाहिनी प्रत्येक तालूक्यात पाणी देण्यासाठी होती. योजनेच्या एकूण खर्चा पैकी १०,५९५ कोटींचा पहिला टप्प्यात आर्थीक तरतूद केलेली होती. तर ३,८५५ कोटी अशुध्द पाणी मुख्य जलवाहनी साठी होते.

 

केवळ पिण्याचे पाणी नाही तर शेती आणि उदयोगाला लागणारे पाणी नियोजन यात होते. खरं तरं ही योजना मराठवाडयातील सामान्य जनता शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरणारीच होती. मात्र सरकार बदलताच महाविकास अघाडीच्या सरकारने जनतेच्या तोंडचे पाणी काढताना योजनाच गुंडाळली आहे. याची भिती होती म्हणूनच माजी मंत्री सौ.पंकजाताई मुंडे यांनी पाणी प्रश्नावर संभाजीनगरला एक दिवसाचे उपोषण केले होते. मराठवाडयाला क्रिडा विद्यापिठ फडणविसांनी मंजूर केलं पण ठाकरे सरकार येताच रात्रीतून पुण्यात हलवले. हे सरकार मराठवाडयातील जनतेवर राजकिय सूड उगवत असून विकासाची योजना बंद करणे म्हणजे या विभागाला विकासापासून वंचित ठेवणे असे आहे. मराठवाडयात सरकारचे पाच मंत्री आहेत. एकही मंत्री या प्रश्नावर बोलत नाही हे दुर्देव म्हणावे लागेल. जनतेच्या प्रश्नाला धरून द्वेषाचे राजकारण ठाकरे सरकार करु पाहत आहे हे मात्र नक्की.                           

 

 

 


Tags: BJPchief ministerdevendra fadnavisMarathwadaThackeray governmentWater Grid Schemeठाकरे सरकारदेवेंद्र फडणवीसभाजपमराठवाडामुख्यमंत्रीवॉटर ग्रिड योजनाशिवसेना
Previous Post

“मुंबई मनपा अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल,” पहारेकरी भाजप आक्रमक!

Next Post

#व्हाअभिव्यक्त! दिल्लीत शेतकऱ्यांवर मोठ्या कारवाईचा डाव ‘असा’ उधळला…

Next Post
delhi farmer protest

#व्हाअभिव्यक्त! दिल्लीत शेतकऱ्यांवर मोठ्या कारवाईचा डाव 'असा' उधळला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!