आता आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो गुजरातमध्ये गेला त्याचं दु:ख नाही. कारण गुजरात हे आपलंच भारतीय राज्य. पण तो महाराष्ट्रऐवजी तिथं नेण्यात आला, त्याचं दु:ख आहे. गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या वाट्याचं बरंच काही गुजरातकडे जाताना दिसतं. या निमित्तानं नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय त्याचा वेध…