Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“कर्मयोगी: दुसऱ्यासाठी कर्म करणारा”

July 1, 2021
in featured, धर्म
2
adhyatm

सुमेधा उपाध्ये / अध्यात्म

कर्मयोगी हा खऱ्या अर्थाने दुसऱ्यासाठी कर्म करणारा असतो. जो जन्मास आलाय त्या कोणासही कर्म करणं चुकवता येत नाही. आता ही कर्म स्वत:साठी स्वत:च्या नात्यांसाठी करावयाची की व्यापक समाज हितासाठी करायची याची निवड विवेकपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा एखादा जीव दुसऱ्याच्या हितासाठी किंवा व्यापक समाज हितासाठी कर्म करीत असतो. निष्काम अंतकरणाने कर्म करीत असतो, आपण केलेल्या कर्मांना तो भगवंताच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक कर्मात ‘मी’पणा न आणता ते भगवंताच्या मर्जीने झाले आहे आणि निमित्त आपण आहोत हे मनापासून मानतो आणि म्हणूनच ते सर्व तो भगवंताच्या चरणीच अर्पण करतो अशा व्यक्तिस आपण कर्मयोगी म्हणत असतो. अलीकडे काही प्रमाणात कर्मयोगी या शब्दाची व्याख्या सोयीने बदलली जाते. मनात स्वार्थ बाळगून केलेल्या कर्मांचा कर्तेपणा स्वत:कडे घेऊन आपण कर्मयोगी आहोत असा गवगवा करण्यात येतो.

 

कित्तेकदा कर्मयोगी या शब्दाची नेमकी व्याख्या न समजून घेता हा शब्द आपल्या नावाआधी लावण्याची घाई असते. कर्मयोग पूर्णावस्थेला गेल्यानंतर सर्वकर्मसंन्यास आहे. कर्मयोगी कर्म करतो ते स्वत:साठी नसतंच. कोणतंही कर्म करणं म्हणजे कर्मयोग होत नाही. कर्मयोग या शब्दातील योग हा शब्द खूप महत्वाचा आहे. योगयुक्त कर्म केलं तरच ते भगवंताची प्राप्ती करून देतं. भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर राहणं हा योग आहे. योगाशिवाय केलेलं कर्म कितीही उत्तम असलं तरीही ते भगवंताची प्राप्ती होण्यास कमी आहे. आसक्ती पूर्णत: संपल्याशिवाय अंत:करणात भगवंत स्थिर कसा होणार? म्हणूनच गीतेत भगवंत म्हणतात की- योगस्थ होऊन कर्म कर, भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर ठेव त्यानंतर झालेली कर्म महत्वाची ठरतात. भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर ठेवून कर्म करणं असं घडलं तर त्याचा अर्थ असा होईल की आता माझी कोणतीच ईच्छा नाही, मनात स्वत:साठी काही कामना उरलेली नाही तेव्हा ती कर्म निष्काम कर्म होतील.

 

ज्ञानदेव म्हणतात- आईकें योगी आणि सन्यासी जनीं|

हे एकचि सिनाने झणीं मानी|

एरव्ही विचारिजती जंव दोन्ही | तंव एकचि ते ||

जो कर्मयोगी असतो तोच सन्यासी असतो. एकाच व्यक्तीची दोन नाव असावीत त्याप्रमाणे हे आहे. कामना सोडून जो कर्म करतो तोच कर्मयोगी, तोच कर्मसन्यासी.

 

आपल्या कर्मांच्या परिणामांची चिंता न करता समाजाच्या किंवा दुसऱ्याच्या व्यापक हितासाठी कार्यरत असलेली व्यक्तिच कर्मयोगी असते. सकर्म आणि निष्कामकर्म असे दोन प्रकारचे कर्म असतात. काहीतरी मिळवण्याच्या लालसेनं केलेली कर्म ही निश्चितच सकाम कर्म होत आणि कोणत्याही फळाची अभिलाषा न धरता केलेली कर्म ही निष्काम कर्म असतात. ती सर्व भगवंताला अर्पण केली जातात. त्यात काहीही मिळवायचंच नसतं. कर्म फळ प्रारब्ध होऊन पुढील जन्मांमध्ये सोबतच येत असतात. त्यामुळं आपली कर्म जेव्हा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि त्यात स्व कामना नसते. फळाची अपेक्षाच नसते त्यामुळं ती प्रारब्ध होऊन जीवास फळ देत नाहीत. ज्याचा सर्व भार भगवंतानं उचलला आहे, त्या जीवाचा उद्धार हा निश्चित होत असतो. कर्मगतीची तीव्र धार अशा कर्मयोगींसाठी थोडीतरी बोथट होत जाते. जीवाला त्याची झळ लागण्याआधीच भगवंत त्याची धार बोथट करीत जातो. त्यामुळं कर्मयोगी होऊन कर्मसंन्यासी होण्याची प्रवृत्ती वाढीस लागण्याची जीवास आवश्यकता असते.

 

Sumedha upadhye

(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)

 

हेही वाचा: “जीवाचे कर्म ईश्वराधीन आहे”

“जीवाचे कर्म ईश्वराधीन आहे”


Tags: karmayogiSumedha Upadhyeकर्मयोगीसुमेधा उपाध्ये
Previous Post

‘कोरोना दरम्यान राजकीय गर्दी रोखा!’

Next Post

महागाईचा भडका! सर्वसामान्य गॅसवर! महागाईची हडळ सोडून पडळकरांमागे सर्व!

Next Post
LPG

महागाईचा भडका! सर्वसामान्य गॅसवर! महागाईची हडळ सोडून पडळकरांमागे सर्व!

Comments 2

  1. Sunita tannir says:
    4 years ago

    Nice

    Reply
  2. Jaie kulkarni says:
    4 years ago

    Sunder

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!