Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सोमय्यांचा मोर्चा अजित पवारांकडे! पण राऊतांच्या आरोपांवर बाजू मांडत नसल्याने चर्चा!

April 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Kirit Somaiya (2)

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या हे संजय राऊतांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मोर्चा वळवला आहे. ते आता जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी ईडीकडे प्रयत्न करत आहेत. मात्र, सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करून ५८ कोटी रुपये हडपल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केला आहे, त्यावर ते बोलत नसल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

 

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. मात्र, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या पैशांचं नेमकं सोमय्यांनी काय केलं? या प्रश्नाचं उत्तर किरीट सोमय्यांनी दिलेलं नाही. याबाबतीत माध्यमांनी प्रश्न विचारण्याआधीच सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत संपवली. सोमय्या थेट जरंडेश्वर कारखाना प्रकरणी शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.

 

काय म्हणाले किरीट सोमय्या?

  • विक्रांत प्रकरणी एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही.
  • मी दमडीचाही घोटाळा केला नाही.
  • त्यामुळे मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे.
  • संजय राऊत यांनी आरोप केले पण अद्याप ते कोणत्याही प्रकारचा पुरावा देऊ शकले नाहीत.
  • एफआयआर दाखल केले आहे, पण मला अद्याप एफआयआरची प्रत मिळाली नाही.
  • माझे उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी द्यावी, मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही.
  • मी चौकशीला तयार आहे.
  • पोलिसांच्या कोणत्याही चौकशीचे मी स्वागत करत असल्याचे सोमय्या म्हणाले.
  • दरम्यान, ठाकरे सरकारचे घोटाळे मी बाहेर काढत आहे आणि पुढेही काढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

  • संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवरून सोमय्या यांनी काही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
  • यावेळी सोमय्या यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
  • मात्र, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या पैश्यांचं नेमकं सोमय्यांनी काय केलं? या प्रश्नाचं उत्तर किरीट सोमय्यांनी दिलेलं नाही.
  • याबाबतीत माध्यमांनी प्रश्न विचारण्याआधीच सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत संपवली.

 

राऊतांनी काय आरोप केले?

  • संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले.
  • कोट्यवधी रुपये जमा केले.
  • त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले.
  • स्वतः किरीट सोमय्यांनी ५७ ते ५८ कोटी रुपये जमा केले.
  • मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत.
  • केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी.
  • विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली, याचा छडा लावावा.
  • आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली आहे.
  • या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी.

 

पत्रकारांच्या प्रश्नाला अद्याप सोमय्यांकडून अस्पष्ट उत्तर

  • पत्रकारांच्या प्रश्नाला अद्याप सोमय्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.
  • मला न विचारता पोलिसांनी कलम ४२० लावलं.
  • मला अटक करण्यासाठी कलम लावण्यात आले आहेत.
  • ५८ कोटींचा आकडा कुठून आला हे उद्धव ठाकरेंनी सागांवं.
  • आयएनएस विक्रांतबद्दल दाखल गुन्हाची कॉपी उशिरा मिळाली.
  • कॉपी देण्यास टाळाटाळ सुरु होती.
  • जुन्या आरोपांच राऊतांनी पुरावे का दिले नाहीत?

Tags: EDINS VikrantKirit SomaiyaPress Conferencesanjay rautआयएनएस विक्रांतईडीकिरीट सोमय्यापत्रकार परिषदसंजय राऊत
Previous Post

#मुक्तपीठ #Live “कोल्हापुरात शिवसेनेवर काँग्रेसचा झेंडा घेण्याची नामुष्की” – प्रवीण दरेकर

Next Post

“चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
जागतिक आरोग्य दिन 2

“चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!