Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खरीप गेला, रब्बीही गेला, आता तरी पिक विमा द्या!

April 21, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Crop insurance

शिरीष भोसले

अतीवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता वरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत होत चालली आहे. शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने नुकसानभरपाईबरोबरच पिक विमा देखील मिळणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने शासनाने पिक विमा हफ्ता पिक विमा कंपनीला अदा केलेला आहे. परंतु विमा कंपनीच्या निष्क्रिय व भ्रष्ठ कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिक विमा मिळाला नाही. याचा विचार करता शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांना निर्वाणीचा इशारा द्यावा लागत आहे, लवकरात लवकर विमा वाटप सुरु केले नाही, तर पिक विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या अंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.

 

या वर्षी खरीपाबरोबरच रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाले आहे. खरीपातील मुग,कापुन,सोयाबीन, तुर, बाजरी ही पिकांचे नुकसान झाले असून, पंधरा दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेला गहु, हरभरा, कांदा तसेच बाजरी व इतर फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गारपीटीच्या पावसामुळे पूर्ण रब्बी पीके मातीमोल झालेली आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने व विमा कंपनीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा वाटप करुन दिलासा देणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. अर्थव्यस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी झोपेचं सोंग घेणार असतील आणि पिक विमा कंपनी आपला मुजोरपणा सोडणार नसेल तर शेतकरी त्यांना चांगलाच धडा शिकवतील. त्यामुळे अशा संकटग्रस्त काळात शासनाने हस्तक्षेप करुन पिक विमा कंपनीला देण्यासाठी भाग पाडावे व शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुरळीत करावी जेणेकरून पुढच्या हंगामाच्या मशागतीची तयारी करणे सोयीस्कर ठरेल.

उत्पादन खर्चाची सुद्धा पुर्तता न झाल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. शेतकऱ्यांचे पोट हे शेतीतल्या उत्पादनावर भरत असल्यामुळे आता दैनंदिन खर्चाची सुद्धा घडी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,अशा परिस्थितीत सरकारने जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. त्यामुळे सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे व वेळीच हस्तक्षेप करुन या घडीला विमा कंपनीला विमा देण्यासाठी भाग पाडावे अन्यथा शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करून दणका देतील!

(शिरीष भोसले हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत)


Tags: crop insuranceshirish bhosaleswabhimani shetkari sanghadnaखरीप पिकपिक विमारब्बी पिकशिरिष भोसलेस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली ?

Next Post

पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड

Next Post
rohit sharma

पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!