मुक्तपीठ टीम
शिवसेना हा विश्वास बाळगावा असा पक्ष आहे. काँग्रेस देशभरात पराभूत झाली असतानाही त्यांनी बाळासाहेब असताना विधानसभा निवडणूक न लढवता साथ दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.
पंतप्रधान – मुख्यमंत्री भेटीबद्दल शंका नको!
• कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू.
• पण शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
• पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या.
• मात्र तशा शंका उपस्थित करणे योग्य नाही.
पक्ष अनेक, राष्ट्रवादी एकच!
• या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले.
• राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे की गेली २२ वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
• सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण त्याचवेळी नवीन लोक तयार झाले.
आघाडी सरकारचं काम उत्तम
• हे आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं.
• कधी वाटलं नव्हतं सेनेबरोबर आपण सरकार बनवू.
• हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
• शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे.
• हे सरकार पाच वर्ष टिकेल. एव्हढंच नाही तर लोकसभा, विधानसभेला चांगली कामगिरी करेल.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्वाची
• सहकाऱ्यांच्या कष्टानं राष्ट्रवादी काँग्रेसने २२ वर्ष पूर्ण केली.
• राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे.
• सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता गरजेची आहे.
• ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील.
• मविआ सरकार पाच वर्ष टिकणार, फक्त टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करत राहणार.
• देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही.