Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मराठ्यांनो, राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडून समाजाचा विचार कधी करणार?

June 7, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
maratha reservation

संजीव भोर पाटील / व्हाअभिव्यक्त!

आरक्षण आणि इतर अनेक समस्यांबाबत मराठा समाजावर पराकोटीचा अन्याय सुरू आहे. मराठा समाजातील छोट्यात छोटा ते मोठ्यात मोठा कार्यकर्ता, नेता (अपवाद फार थोडे) समाजाच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर देखील भूमिका घेताना आधी आपला पक्षच कसा खरा हे मांडण्याचा आटापिटा करताना रोजच दिसतो आहे. उदाहरणादाखल समाजाशी निगडीत काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्या समोर ठेवतो. आपले पक्षप्रेम बाजूला ठेवून समाज हितासाठी तटस्थ नजरेने जरा विचार करून बघा. मागे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी एका निर्णयाद्वारे सुधारणा केल्या होत्या. मात्र न्यायालयाच्या या निर्णयास SC, ST वर्गाने विरोध केला. कॉंग्रेसवाल्यांनीही या निर्णयाचा आंदोलन करून विरोध केला. एखाद्या कायद्याच्या गैरवापराने असंख्य लोक देशोधडीला लागले तरी ते तसेच चालले पाहिजे अशी भूमिका राजकीय पक्षांकडून घेतली जावी व यास त्याच पक्षातील सर्वांचे समर्थन कसे असू शकते? या पक्षातील मराठा किंवा इतर जातींतील नेत्यांस,कार्यकर्त्यांस याचे काहीच वाटू नये? राजकारणापायी समाज किती दुय्यम ठरवला जातो पहा!

 

भाजप व मोदींनीही संसदेत पुन्हा आणखी कठोर कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच रद्दबातल ठरवला.मात्र यास या पक्षातील एकाही मायच्या लालला काहीच वाटू नये? म्हणे कट्टर हिंदू!!

 

दुटप्पीपणा आणि लबाडीचा कळस पहा. अॅट्रॉसिटी प्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाने SEBC अर्थात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्या नंतर आता पुन्हा मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास ते संसदेत कायदा करूनच दिले जाऊ शकते.अॅट्रॉसिटी बाबत कठोर कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणारे मोदी व भाजप मराठ्यांच्या आरक्षणासाठी हे करायचं नावही घेत नाहीत. मराठा हिंदू नाहीत का? भाजपातील एकही मराठा नेता मोदींकडे अशी मागणी करायला धजावत नाही,उलट मराठा आंदोलन कसे पेटेल व त्याचा राज्यातील सत्ताधार्यांना कसा उपद्रव होईल यासाठी या पक्षातील मराठा नेते उतावीळ झालेले पहायला मिळत आहेत. राजकीय स्वार्थासाठी आंदोलनात मराठा समाजाची किती हाणी होईल आणि त्यातून खरंच समाजाला आरक्षण मिळेल का याचा यत्किंचितही विचार ही मंडळी करीत नाहीत याचे नवल वाटते. राजकीय लाभापुढे समाज इतका क्षुल्लक ठरतो!!

असंच पदोन्नती तील आरक्षणांचंही आहे.सरकारी नोकरीत बढती देताना SC,ST आणि काही ओबीसींना आरक्षण देण्याची गरज नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला व या निर्णयास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. असेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षणही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असल्याने आमच्या हातात काही नाही अशी रोज बोंब ठोकणारे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पदोन्नती आणि राजकीय ओबीसी आरक्षण प्रकरणी मात्र न्यायालयांचे निर्णय कसे डावलता येतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.काँग्रेसने तर यासाठी प्रसंगी राज्यातील सत्तेतून बाहेर पडू इतकी टोकाची भूमिका घेतली आहे.हाच कॉंग्रेस पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत का इतकी कठोर भूमिका घेत नाही? नितीन राऊत, वडेट्टीवार, भुजबळ, वर्षा गायकवाड, आदी स्वजातीसाठी मराठा समाजाच्या विरोधात थेट भूमिका तर घेत आलेच आहेत, त्यापुढे जाऊन न्यायालयाच्या निर्णयासही हे लोक जुमानत नाहीत. हे नेते जसे यांच्या जातींच्या विषयावर बांधिलकी ठेवतात तसा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत एकही मराठाभिमानी नेता नाही? कि या तिन्ही पक्ष व पक्षांतील नेत्यांनी मराठा समाजाला खिशात घालून ठेवले आहे!

पदोन्नतीबाबत अजीत दादा पवारांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनात भूमिका घेतली खरी, मात्र तीही कुठपर्यंत टिकेल त्यांनाच माहीत!अजित दादांबरोबर तिन्ही पक्षांतील इतर एकाही मराठा, खुल्या प्रवर्गातील आमदार, खासदाराने, कोण्या नेत्याने एक शब्दही बोलू नये? आणि यांना बोलायचे तरी काय आहे, फक्त न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करायचे आहे,स्वतःच्या समाजाच्या हिताची एवढीशी भूमिका घ्यायला जे कचरत असतील त्यांना व त्यांच्या पक्षाला समजाने आपले का म्हणावे?

वरील सर्वच विषयांचे तटस्थपणे विश्लेषण केल्यास आपल्या हे लक्षात यायला हवे कि,सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मराठ्यांना गुलाम समजत आहेत.मराठ्यांचा वापर कसा करून घेता येईल, मराठ्यांच्या आडून राजकारण कसं साधता येईल,मराठ्यांना कसं झुंजायला लावता येईल याचीच गणितं करण्यात राजकीय पक्ष व नेत्यांना स्वारस्य आहे. मराठा समाजातील लोकांना राजकारणाचे वेड आहे, त्या वेडापायी हे लोक समाजाच्या प्रश्नांसाठी कधीच एक होऊ शकत नाहीत,राजकिय गुलामगिरी करण्यातच मराठा समाज धन्यता मानतो अशी समाजाबाबत धारणा झाली आहे.

मराठा बांधवांनो, केव्हा तरी आपण समाजाच्या या अवस्थेचा गांभीर्यपूर्वक विचार करणार आहोत की नाही? जोपर्यंत मराठा समाजातील लोक आपल्या जातीच्या प्रश्नांबाबत राजकीय नेते व पक्षांना जबाबदार धरीत नाहीत व त्यांना जाब विचारणार नाहीत,आणि प्रसंगी मतदानातून धडा शिकविण्याची भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत समाजाची वाताहत थांबणार नाही. हात जोडून विनंती आहे, विचार करा.🙏🙏🙏🙏
जय शिवराय!

sanjiv bhor patil

(संजीव भोर पाटील हे शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संपर्क ९९२१३८११८१)


Tags: chhagan bhujbalEnergy Minister Dr. Nitin RautMinister Vijay wadettiwarNCPShivsenavarsha gaikwadभाजपामराठा आरक्षणराष्ट्रवादीसंजीव भोर पाटील
Previous Post

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी कुलगुरुंचा शोध सुरु

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राबवली ‘मी रक्तदाता’ संकल्पना

Next Post
ravindra waikar

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राबवली ‘मी रक्तदाता’ संकल्पना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!