Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

शरद पवार हे तपास यंत्रणांचे टार्गेट…संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

March 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut-sharad pawar-devendra fadnvis

sanjay raut-sharad pawar-devendra fadnvis


मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केलीच तसेच त्यांनी एक धक्कादायक विधानही केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे टार्गेट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.

केंद्रीय तपास यंत्रणांसमोर शरद पवार हे टार्गेट

  • केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत सूडबुद्धीने वागतात.
  • त्यांना टार्गेट दिले आहेत.
  • हे तुमचे टार्गेट आहेत.
  • तुम्ही या टार्गेटवर हल्ले करत राहा.
  • त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा काम करतात.
  • विरोधी पक्षातले टार्गेट आहेत.
  • या देशात असं कधी घडलं नाही.
  • शरद पवार हे त्यांचे टार्गेट आहे.
  • त्यांना बदनाम केले जात आहे.
  • त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे.
  • ही कालची पोरं, काल पक्षात आलेले लोक हे पवारांविषयी ज्या भाषेत बोलतात, हे फडणवीस, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांना तरी मान्य आहे का? जर मान्य नसेल तर, त्यांनी महाराष्ट्राचे पुढारी म्हणून त्याचे खंडन केले पाहिजे.
  • तसेच निषेध केला पाहिजे.
  • राजकीय मतभेद असू शकतात.
  • पण ज्या पद्धतीची भाषा महाराष्ट्रात पवार यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी वापरली जाते, ते योग्य नाही.
  • महाराष्ट्रात अशा लोकांचा सन्मान ठेवायला हवा, ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं.
  • त्यांच्याविषयी कोणती भाषा भाजपची लोकं वापरत आहेत?

विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज!

  • संजय राऊत यांनी आज, सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
  • यावेळी राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.
  • निवडणुका आल्या की, अनेक मुद्दे आधी जिवंत केले जातात आणि निवडणुकांना ‘काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत…’ एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो.
  • अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवर भर दिला जात असल्याचे दिसते.
  • निवडणुका या त्यावरच लढवल्या जात आहेत.
  • पाच वर्षांत पुन्हा त्याच जुन्या मुद्द्यांवर येतात.
  • आता लोकांना सवय झाली आहे.
  • लोकं सुद्धा त्यासोबत वाहून जात आहेत.
  • चार राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपा, तर एका राज्यात आम आदमी पक्ष जिंकला आहे.
  • विजयाचा उन्माद नको, अजीर्ण होऊ नये, तो सत्कारणी लावावा.
  • विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.

 

मोदींचे नेतृत्व देशात सगळ्यात उंच!

  • देशाचे पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नसतात.
  • हे या भाजपाच्या नेत्यांना समजायला हवं.
  • मोदी यांचे नेतृत्व देशात सगळ्यात उंच आहे हे गेली अनेक वर्षे सांगतो.
  • पण मोदी फक्त आमच्या पक्षाचे, गटाचे आहेत, अशा प्रकारचे वातावरण भाजपाचे लोक निर्माण करत आहेत.
    ते देशाचे नेतृत्व करतात.
  • दुर्दैवाने त्यांची भाषणे ऐकली तर, या चक्रातून त्यांनी बाहेर पडले पाहिजे.
  • महाराष्ट्रातील काही नेते आहेत, त्यांनाही ते समजायला हवे.
  • काही लोकांना मोठेपण मिळाले असेल तर, ते टिकवता येत नाही.

 

राऊतांकडून फडणवीसांना प्रत्युत्तर…

  • देवेंद्र फडणवीस यांना विजयाचे शिल्पकार म्हटले जात आहे, या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिलं.
  • ‘विजयाच्या शिल्पकाराला नोटीस येऊ नये, असं कुठं म्हटलंय.
  • नोटिसा आम्हालाही येतात.
  • पण आम्ही तमाशे केले नाहीत.

Tags: devendra fadanvisEDMaharashtraNationalist Congress partysanjay rautsharad pawarकेंद्रीय तपास यंत्रणादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशरद पवारसंजय राऊत
Previous Post

फडणवीसांच्या पोलीस चौकशीवर शेलारांचा स्थगन, वळसे-पाटील म्हणाले, “ती तर रुटीन चौकशी!”

Next Post

सहकारी साखर कारखान्यांची विक्री! अण्णा हजारेंच्या पत्राबद्दल भाजपाने सरकारला धारेवर धरले!

Next Post
Anna Hazare (3)

सहकारी साखर कारखान्यांची विक्री! अण्णा हजारेंच्या पत्राबद्दल भाजपाने सरकारला धारेवर धरले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!