मुक्तपीठ टीम
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवरील पैसे काढण्यासाठी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा आरोप चुकीचा ठरवतानाच दुसरीकडे हे प्रकरण वाटते तेवढेच नाही. स्फोटकांचा विषय वाझे-परमबीरांवर आटपू नका, असे बजावत या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे. जो विचार अतिरेकी करतात, तो विचार पोलिसांना करण्यासाठी कोणी भाग पाडले याचा तपास गरजेचा आहे. तसे नाही झाले तर उद्या अनेकांच्या घराबाहेर स्फोटकांच्या गाड्या उभ्या राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे – मुकेश अंबानींचे मधुर संबंध, पैसे काढण्याचा आरोप चुकीचा!
- परमबीर सिंग यांचे पत्र धक्कादायक, देशाच्या इतिहासात असं कधी घडलं नाही
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खूप मधुर संबंध आहेत.
- खूप मुद्दे आलेत. अंबानींकडून पैसे काढायचे आहेत, असे म्हटले गेले.
- पण त्यांचे संबंध चांगले आहेत.
- पैसे काढण्यासाठी कटाचा दावा चुकीचा
- स्फोटकांसोबपत मिळालेले पत्र गुजरातीसारख्या हिंदीतील.
- धमकीच्या पत्रात मुकेश भैया, नीता भाभी अशी आदरयुक्त भाषा कशी?
- सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घ्यावे, यासाठी उद्धव ठाकरे मागे लागले, असे देवेंद्र फडणवीस बोलले.
- वाझे प्रकरण जर नीट पाहिले तर तो ख्वाजा युनूस प्रकरणात तो १७ वर्षे निलंबित होता.
- शिवसेना-भाजपा सरकार आले, तेव्हा त्याने शिवसेनेत प्रवेश केला.
- शिवसेनाप्रवेशासाठी वाझेंना कोण घेऊन गेले?
केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी
- मूळ विषय हा मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली होती.
- तो मूळ विषय हा खूप महत्वाचा आहे.
- गाडीतील जिलेटिन आले कुठून?
- याप्रकरणात केंद्राने तात्काळ हस्तक्षेप करावा
- अंबानींच्या घराबाहेर गाडी ठेवल्याची केंद्र सरकारने चौकशी करावी.
- कुणाच्या तरी आदेशाविना पोलीस अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवू शकतात का?
- अशा प्रकारे पोलीस परस्पर धाडस करु शकत नाहीत.
- पोलिसांवरचा विश्वास कायम राखण्यासाठी योग्य चौकशीची गरज.
- अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे.
- परमबीर सिंह यांची बदली केली. पण का केली ते सरकारने अद्याप सांगितलेले नाही,