Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धर्मांध हरणार, महाराष्ट्र जिंकणार!

April 18, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
politics on use of loudspeaker on mosque in Maharashtra

दिलीप नारायणराव डाळीमकर

जातीय व धर्मद्वेषाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल. कारण आपल्या राजकीय चुली पेटत ठेवण्यासाठी काही राजकीय नेते धार्मिक व जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे.

 

महाराष्ट्राच्या इतिहासात अलीकडच्या काळात एक क्रांती झाली.ही क्रांती मराठा क्रांती मोर्च्याच्या रूपाने अवघ्या जगाने बघितली. मराठा मोर्चात सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा लक्षणीय सहभाग बघितल्यावर आपल्यासाठी दगड कोण उचलणार, घरे कोण जाळणार, तोडफोड कोण करणार, हा प्रश्न धर्मांध राजकीय सामाजिक नेत्याच्या मनात उभा राहत आहे.

 

याचे कारण अनेक वर्षांनंतर हातात भगवा घेऊन मुसलमान चालताना दिसतोय. मराठा मोर्चात मराठा समाजाच्या पावलाला पाऊल लावून अठरापगड जातीचे लोक सहभागी झालेले होते. हेच या मराठा मोर्चाचे यश असून मराठा मोर्चाने मोर्चाने इतिहासाला एक वेगळी दिशा दिली.

 

मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात एक वेगळा इतिहास लिहिला, अठरापगड जाती एकत्र केल्या, तेच मराठे आता पुन्हा तोच इतिहास लिहीत आहेत. आज परत एकदा अठरापगड जाती एकत्र येत आहेत. मदारी मेहतर नावाची पाणपोई दिसली. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आग्रा येथून महाराज निघून रायगडावर सुखरूप पोहोचले, तेव्हा हेच मदारी मेहतर स्वत: महाराजांच्या शय्येवर झोपून राहिले.

 

आजही त्या मदारी मेहतर यांची आठवण येते. तोच सामाजिक एकोप्याचा इतिहास पुन्हा एकदा मराठे लिहीत असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाज बदलतोय, मराठे पुन्हा एकदा नवीन इतिहास लिहीत आहेत आणि याच इतिहासावरून संपूर्ण महाराष्ट्र शिकेल आणि पुढे जाईल.

 

आजकाल भोग्यांचे राजकारण महाराष्ट्रात जोरात शिजत आहे.या राजकारणातून धार्मिक भावना भडकविण्याचा उद्देश दिसून येत आहे. यातून समाजहित घडणार नाही.मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाबरोबर एकत्र आलेल्या अठरापगड जाती व मुस्लिम समाज या धार्मिक द्वेषापासून नक्कीच दूर राहत आहे. त्यामुळे कोणीही कितीही धार्मिक जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न केला तरी या छत्रपतीच्या पुरोगामी महाराष्ट्रात दंगली पुन्हा होणार नाही असा विश्वास वाटतो.फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांनी तरुणांचे डोके सुधारले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात नक्कीच शांतता नांदेल असा मनात विश्वास आहे.

दिलीप नारायणराव डाळीमकर
पुणे


Tags: dilip dalimkarLoudspeaker on mosqueMaharashtraMaratha Reservationदिलीप नारायणराव डाळीमकरमहाराष्ट्र
Previous Post

महागाई, बेरोजगारी या मुळ विषयांवर कोण बोलत नाही – जयंत पाटील

Next Post

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील कोटमगावसह जिल्ह्यातील ६ देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त

Next Post
Kotam Gaon temple

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील कोटमगावसह जिल्ह्यातील ६ देवस्थानांना 'ब' वर्ग दर्जा प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!