Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले – नवाब मलिक

शेतकऱ्यांच्या लढ्याला ऐतिहासिक विजय मिळाला

November 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
nawab malik on farm laws

मुक्तपीठ टीम

शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले आहे. हा विजय शेतकऱ्यांचा लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचे कौतुक केलेच शिवाय प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन केले आणि मोदी सरकारला लढ्याच्या रुपाने मनमानी कारभार चालणार नाही हे शेतकऱ्यांनी दाखवून दिल्याचे माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

 

आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा देशातल्या शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल असा हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

 

‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’
तीनों कृषि कायदे वापस लिए गए,
हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021

 

जे शेतकरी तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत यासाठी लढा देत होते त्यांना भाजपच्या लोकांनी खलिस्तान्यांचे आंदोलन असे संबोधले. राष्ट्रविरोधी आंदोलन असल्याचा आरोप झाला. अन्याय अत्याचार सहन करत शेतकरी आंदोलन करत राहिले. शेतकऱ्यांची चिरडून हत्या करण्यात आली. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सात वर्षात आम्ही करु तोच कायदा या भूमिकेतून मोदी सरकार काम करत होते मात्र देशभरात शेतकऱ्यांनी केलेले तीव्र आंदोलन लक्षात घेता त्याचा फटका आगामी उत्तरप्रदेशमध्ये आणि पंजाब निवडणुकीत बसेल या कारणाने हे तिन्ही कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

 

ताकदीने इमानदारीने लढा उभारला तर त्यात यश हे नक्की मिळते. वर्षभर हा लढा चालला त्याचे हे यश आहे. या देशात यापुढे मनमानी कारभार चालणार नाही हे या लढयाने दाखवून दिले आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.


Tags: farm lawsfarmersNarendra modiNawab Malikकृषी कायदेनवाब मलिकपंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रवादी काँग्रेसशेतकरी
Previous Post

ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना तिसरा अव्वल पुरस्कार जाहीर

Next Post

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

Next Post
jayant patil on farm laws

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!