Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवंगत भय्यूजी महाराज देशमुख यांना मरणोपरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार

March 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 1

मुक्तपीठ टीम

भारताच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व दक्षिणेकडील चेन्नम्मा या महिला राज्यकर्त्यांचे कार्य दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी देवींची आठवण करून देणारे आहे. अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचेप्रमाणेच त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

 

सागा फिल्म्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ विकास महात्मे, होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंतराव होळकर व श्रीमती नायरिका होळकर, आमदार अभिमन्यू पवार व सागा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

इतिहासात जो समाज आपल्या पूर्वजांना विसरतो तो समाज संपतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या सुशासन पद्धतीचे अनेक इंग्रज लेखकांनी वर्णन केले आहे. द्वारका व काशी येथे मंदिरांप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याला देखील सहकार्य केले असल्याचे सांगून समाजाने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रती कृतज्ञ राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार थोपवायचा असेल तर सर्वांनी हात धुणे, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोनाला घाबरून घरी न बसता प्रत्येकाने पुरेशी काळजी घेऊन निर्भीडपणे आपापले काम केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

 

यावेळी दिवंगत भय्यूजी महाराज देशमुख यांना मरणोपरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भय्यूजी महाराजांच्या कन्या कुहू देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. दिग्दर्शक व निर्माते केदार शिंदे यांना देखील राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपट निर्माते सुनील मनचंदा, समाजसेवक नितीन शेटे, संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख, विश्वासराव देवकाते, सोमनाथराव होळकर, राजस्थान येथील पोलीस अधिकारी हिमांशू सिंह राजावत, गडकिल्ल्यांचे अभ्यासक व संरक्षक मारुती गोळे व चित्रकार शेखर वसंत साने यांना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.


Tags: Bhaiyyu Maharajgovernor bhagat singh koshyariअहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारभय्यूजी महाराजराज्यपाल कोश्यारीराज्यमंत्री रामदास आठवलेसागा फिल्म्स फाउंडेशन
Previous Post

क्रीडा थोडक्यात: १) कोरोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी केली. विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. दडपण वाढवत कॅलाडझिन्स्कायने ४ गुणांची कमाई केली. पण अखेर विनेश हिने १०-८ अशा फरकाने विजय मिळविला. २)भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौऱ्याची शानदार सुरुवात केली. निळकंठ शर्मा (१३व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (२७व्या आणि २८व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (४१व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (४२व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहेय. तर चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय भारताने मिळविला आहे. ३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामातील सामन्यांसाठी चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा पाच शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे. हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही आहे. ४) इंग्लंड विरोधातील अहमदाबादमध्ये कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याने आयसीसीकडून जाहीर झालेल्या रॅकिंगमध्ये सहा स्थानांनी झेप घेतली आहे. तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ धावा केल्या, तर दुसर्या डावात नाबाद २५ धावा केल्या. त्यासोबतच आयसीसीने म्हटले आहे की, आता मालिका संपल्यावर रँकिंग जाहीर होण्याऐवजी मार्चपासून दर आठवड्याला रँकिंग जाहीर होणार आहे. ५) टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कसोटी सामना पार पडल्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला असल्याचे सांगितले जात आहे.

Next Post

चार दिवसात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

Next Post
lpg

चार दिवसात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!