मुक्तपीठ टीम
मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, अशी माहिती मुंबई मनपाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.मनपाच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर कोरोना परिस्थितीसंदर्भात माहिती दिली.
कोरोना मुंबई सोडतोय…
- न्यायालयात सादर १५ जानेवारीपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ८४ हजार ३५२ इतकी होती.
- त्यातील सात टक्के रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज भासली.
- याशिवाय तीन टक्के रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले.
- फक्त ०.७ टक्के व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली.
- त्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, औषधांचा साठा, रुग्णालयांतील उपलब्ध खाटा आदींची माहिती आहे.
महापालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन साठा आहे. - रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत.
- त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
वीस हजारांपर्यंत पोहचलेली रुग्णसंख्या आता एक आकडी!
- मुंबईमध्ये कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे का, अशी खंडपीठाने विचारणा केली असता, त्यावर होय, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मनपाने सांगितले.
- आता सर्व काही नियंत्रणात आहे.
- कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.
- ६ ते ९ पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही २० हजारांवर पोहोचली होती.
- मात्र, १५ जानेवारी रोजी रुग्ण कमी नोंदवले गेले.
- ते जवळपास १० हजारांवर आले आणि गेल्या तीन दिवसांत ही संख्या घटून सात हजारांवर आली आहे.