Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“शिंदेसाहेब, मेळघाटात काहीच नाही ओके! पाचडोंगरी मृत्यूंसाठी दूषित पाणी नव्हे, तर दूषित व्यवस्था जबाबदार!”

July 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
MNS Waterman Letter to CM

डॉ. मनोज चव्हाण / व्हा अभिव्यक्त!

देशाच्या स्वतंत्रा पासून मेळघाटला आजही स्वतंत्र्याचा गोडवा अनुभवता आला नाही. याचे मुख्य कारण पिढीजात असलेले दारिद्र, बेरोजगारी, सर्व स्तरातून होणारे शोषण आणि कृत्रिम गुलामी! यामुळे आजही मेळघाट स्वतंत्र झाला नाही. निसर्गाचे जसे तीन ऋतू असतात, तसेच मेळघाटात कधी कुपोषण, रोजगारासाठी स्थलांतरण, उन्हाळ्यात भीषण पाणी समस्या, रोगराई, अंधश्रद्धेचे बळी, मानव वन्यजीव संघर्ष या समस्येचे ऋतू मेळघाटात वर्षानु वर्षापासून अविरत चालत आले आहे. अद्याप तरी कोणत्याही यंत्रणेला यापैकी कोणतिही समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यश आले नाही. पोटाच्या आजाराला, डोक्याची गोळी देवुन वेळकाढू धोरण शासकिय व्यावस्थेचे सुरू आहे. याचीच प्रचिती आज चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी येथे सुरू असलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युतांडवा वरून पुन्हा सिद्ध झाले. शवविच्छेदनात जरी पाचडोंगरी वासियांचा दुषित पाणी प्याल्याने मृत्यू झाला. परंतु, मृतकांच्या कुटुंबातील आणि गावकऱ्यांनी दुषित पाणी पिण्यासाठी कारणीभूत असलेल्या दुषित व्यवस्थेने जीव घेतल्याचे उघडपणे बोलत आहे. तसेच शेकडो नागरिक गंभीर आजाराशी झुंजत आहे. यालाही दूषित व्यवस्थाच जबाबदार आहे.

 

मेळघाटातील पाणी प्रश्नावर लक्ष घाला.

पाणीदूत डॉ @ManojBChavan5 आणि सहकारी मागील अनेक दिवसांपासून मेळघाटात पाणी पुरवठा करत आहेत.

दूषित पाणी पुरावठ्याकडे जातीने लक्ष घालण्यासाठी मनसेचे राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांना पत्र लिहिले आहे. #म #मराठी@mnsadhikrut pic.twitter.com/O09zpKszXE

— Office of Dr.Manoj Chavan (@manojchavanoffc) July 11, 2022

आपण मुख्यमंत्री म्हणून वेळीच दाखविलेली कार्य तत्परतेने सर्व शासन व्यवस्था पाचडोंगरीभोवती धावपळ आहे. तसेच आपण स्वत: कुपोषण आणि आरोग्य व्यवस्था समस्या मुक्तीसाठी मेळघाटला अनेक दौरे केलेत. मेळघाट वासियांच्या भीषण पाणी टंचाई व इतर समस्येवर अंतिम तोडगा तुम्ही नक्की काढावा. आणि मेळघाटमधील आरोग्य यंत्रणेमार्फत गावा गावातील पिण्याच्या पाणी स्त्रोतातील पाणी नमुने तपासणी करून, पिण्या अयोग्य गावातील पाणी समस्या सोडवावी. इतर कोणत्याच गावामध्ये पाचडोंगरीची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी यंत्रणेला सक्तीचे निर्देश देण्यात यावे.

Image

Image

मुख्यमंत्री कार्यालयाचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला कारवाईचे निर्देश

मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाचडोंगरी दुषित पाणी समस्ये बाबत पाठवलेल्या ई-मेल ला मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून, मुख्यमंत्री कार्यालयाने स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांना सदर निवेदनावर कारवाई करण्याकरता निर्देश दिले आहे या संदर्भातला ई-मेल डाॅ. मनोज चव्हाण यांना प्राप्त झाला आहे.

ओकेचा नाही मेळघाटशी संबध

पाचडोंगरी येथील निष्पाप नागरिकांचे तडफळुन होत असलेल्या मृत्युची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न कुटुंबातील सदस्य गमावलेले
पाणावलेले डोळे विचारत आहे. एका तरुणांने आपल्या रक्ताच्या कुटूं प्रमुखा निरोप देतांना, राजकीय व शासकीय व्यवस्थेला सुनावलंय. मेळघाटमध्ये “काय झाडी, काय डोंगुर, काय दूषित पाणी, काय निष्पाप बळी…काय दुषित व्यवस्था, ओकेचा नाही मेळघाटमध्ये संबंध” असे ओरडुन हंबरडा फोडला.

MNS Manoj Chavan

(मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातील मुद्दे)


Tags: Cm Eknath ShindeDr. Manoj ChavanmanasemelghatPachDongriदुषित पाणीपाचडोंगरीमनसेमनोज चव्हाणमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमेळघाटवॉटरमॅन
Previous Post

“पुरस्कार म्हणजे सगळ्या व्यवस्थेला फाट्यावर मारण्याचा परवाना हा भ्रम योग्य नव्हे!”

Next Post

रेल्वेचे प्रवासी आता यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे लोकेशन करू शकतात ट्रॅक

Next Post
Track Central Railway location through Yatri App

रेल्वेचे प्रवासी आता यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे लोकेशन करू शकतात ट्रॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!