Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

विधानसभेत नेमकं काय आणि कसं घडलं…ऐका आमदाराच्या शब्दात!

July 6, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
yamini jadhav

मुक्तपीठ टीम

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप नेत्यांनी विधानसभेत गदारोळ घातला. तालिका अध्यक्षांसमोर केलेल्या राड्यानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. याच पार्श्वभमीवर शिवसेनेच्या भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला दोष देताना त्यांनी विधानसभेत घडलेलं सर्व काही मांडलं आहे.

 

आमदार यामिनी जाधवांची भाजपावर कडवट टीका

  • आमदार यामिनी जाधव यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर कडवट टीका केली आहे.
  • जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात.
  • कधी कधी भावना अनावर होऊन सदस्यांकडून अनुचित प्रकार देखील घडतात.
  • ते स्वाभाविकही आहे. मात्र आपल्या मर्यादांचे भान ठेवणे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतःच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे.
  • त्यापेक्षा अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची ठेवली पाहिजे.
  • मात्र भाजपच्या सदस्यांनी लोकशाहीच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या.

 

जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात. कधी कधी भावना अनावर होतात आणि सदस्यांकडून अनुचित प्रकार देखील घडतात. ते स्वाभाविकही आहे. मात्र आपल्या मर्यादांचे भान ठेवणे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतःच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे.#पावसाळी_अधिवेशन

— Yamini Yashwant Jadhav (@YaminiYJadhav) July 5, 2021

महाराष्ट्र विधानसभेसाठी काळाकुट्ट दिवस

  • महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासातील आजचा दिवस काळाकुट्ट आहे.
  • भाजपाचे आमदार वेलपर्यंत गेले.
  • राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला, कामकाज तहकूब झाले, इथपर्यंत ठीक होते.
  • असे प्रसंग सभागृहात वारंवार घडतात. यापूर्वीही घडले आहेत.
  • असे प्रसंग उद्भवले की पीठासीन अधिकारी आपल्या दालनात दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ सदस्यांना घेऊन वातावरण पूर्ववत करतात.
  • चिडलेल्या सदस्यांची समजूत काढतात. हा प्रघात आहे. असेही त्या म्हणाल्या.
  • मात्र भाजपचे आमदार एका टोळीच्या मानसिकतेत होते.
  • त्यांनी झुंडीने पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दिशेने कूच केली.
  • गोंधळ घातला.

 

भाजपाचा खरा चेहरा उघड झाला!

  • सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर पीठासीन अधिकारी माननीय भास्कर जाधव यांनी सभागृहात केलेले निवेदन भाजप आमदारांच्या हीन मनोवृत्तीवर झगझगीत प्रकाश टाकते.
  • धक्काबुक्की, आई बहिणीच्या शिव्या, झोंबाझोंबी हे नाक्यावर सुद्धा न घडणारे प्रकार प्रत्यक्ष पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आले.
  • संकेत, प्रथा परंपरा यांना अक्षरशः हरताळ फासण्यात आला.
  • सत्ता गेल्याचे शल्य असतेच. पण ते कुठे आणि कसे व्यक्त करायचे, याचेही संकेत असतात. गुंडगिरी, टर्रेबाजी हे त्याचे माध्यम नाही. नाक्यावरसुद्धा असे प्रकार खपवून घेतले जात नाहीत. ते विधिमंडळात घडले.
  • या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा उघड झाला.
  • विरोधी बाकावरचे सदस्य ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक नव्हते, तर महाविकास आघाडीच्या ऐक्याने हतबल आणि सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले.
  • फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडवीत आहे, त्याचाच हा एक पुरावा आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या एकूण १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
  • आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
  • या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
  • संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती विधानसभेत दिली.

Tags: BJPdevendra fadanvismansoon sessionyamini jadhavदेवेंद्र फडणवीसभाजपायामिनी जाधवविधीमंडळ पावसाळी अधिवेशन
Previous Post

सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोनदा

Next Post

गल्ली ते दिल्ली…मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा खरंच आहे?

Next Post
maratha reservation

गल्ली ते दिल्ली...मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा खरंच आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!