Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षण प्रकरण: आता प्रतिक्षा सर्वोच्च निकालाची!

March 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
maratha

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षण खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सर्व बाजू आणि महाराष्ट्र सरकारच्या मागणीनुसार इतर राज्यांचेही ५० टक्के आरक्षण मर्यादेवरील म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शुक्रवारी केंद्र सरकारच्यावतीने अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली. आता सर्व बाजू ऐकून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकालाची प्रतिक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला आहे.

 

मराठा आरक्षण कायदा केंद्र सरकारच्या दृष्टीकोनातून वैध असल्याचा पुनरूच्चार अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर केला. पण त्याच वेळी या खटल्यात अडचणीचा मुद्दा ठरलेली १०२वी घटनादुरुस्ती ही घटनाबाह्य ठरवली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले. मात्र, या घटनादुरुस्तीमुळे राज्यांच्या आरक्षण ठरवण्याचा हक्क काढून घेण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती देत त्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली होती.

 

आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या वर जाऊ नये, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १९९२ साली इंदिरा सहानी खटल्यात दिला होता. त्या निकालातून घालून दिलेल्या आरक्षण मर्यादेचा कालानुरूप पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या पक्षकारांच्या वकिलांनी केला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने इंदिरा सहानी खटल्याच्या निकालाचा पुनर्विचार करायचा की नाही, याबद्दलचा निकालही राखून ठेवला आहे.

 

१०२ वी घटनादुरूस्ती घटनाबाह्य ठरवली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी केला. हा कायदा केंद्र सरकारच्या दृष्टीकोनातून वैध असल्याचे के. के वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही केंद्र सरकार आणि गुजरात सरकारची बाजू मांडली. त्यांनी अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले.

 

मराठा समाजाला राज्यात पुरेसे प्रतिनिधित्व मिळत आहे, असे म्हणत अॅड. बी. एच. मार्लापल्ले यांनी आरक्षणाला विरोध करत असलेल्या पक्षकारांची बाजू मांडली.

 

निकालाकडे सर्वांचे लक्ष

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ९ दिवस सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या मागणीनुसार ५० टक्के आरक्षण मर्यादा तसेच १०२व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर इतर राज्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. सुनावणीदरम्यान घटनापीठाने सर्व बाजू ऐकल्या. आता घटनापीठाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Maratha ReservationmuktpeethSupreme Courtमराठा आरक्षणमराठा आरक्षणाच्या सुनावणीमहाराष्ट्र सरकारसर्वोच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय घटनापीठ
Previous Post

सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Next Post

आग आटोक्यात आणली…पण घरी परतताना त्यांच्यावरच काळाचा घाला!

Next Post
prakash hasbe

आग आटोक्यात आणली...पण घरी परतताना त्यांच्यावरच काळाचा घाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!