Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home विशेष

मतदान दिनानिमित्त लोकशाहीवरही बोलू काही तरी…

January 25, 2022
in विशेष, व्हा अभिव्यक्त!
0
National voter day

मंगेश बेले

भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, भारताला स्वतंत्र मिळून आज जवळपास ७५ वर्ष पूर्ण होत आहे. भारताची राज्यघटना सन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत करून आपण स्वतां प्रत अर्पण केली व सन २६ जानेवारी १९५० रोजी तीची अमलबजवणी झाली. हा अमलबजावनी चा दिवस म्हणजेच भारतीय जनतेला मिळालेले खरे स्वतंत्र होय. यामध्ये मतदान करण्याचे स्वतंत्र हे आजच्या दिवसासाठी आपल्याला महत्त्वाचे ठरते. घटना अमलात आल्यानंतर मतदानाचे वय हे २१ वर्षच होते म्हणजेच भारतातील नागरिकांनी २१ वर्ष पूर्ण केल्यावरच त्याला मत देण्याचा अधिकार होता. परंतु नंतर घटनेत दुरुस्ती करण्यात आली त्या दुरुस्तीला ६१ वा घटना दुरुस्ती कायदा असे संबोधण्यात आले आणि या दुरुस्तीने पूर्वी च्या मतदानाच्या वयात बदल करून २१ वरून आता १८ करण्यात वर्ष आले.

परंतु आजची परिस्थिती पाहता आजही भारतीय नागरिकांमध्ये याबद्दल जागृती नाही. मतदान केवळ करायचे म्हणून करतात, पण त्यामागील उद्देश काय आहे? आपल्या मताला किती किंमत आहे? असले प्रश्न सुद्धा त्याच्यासमोर उभे राहत नाही ही आजच्या परिस्थितीत खूप मोठी शोकांतिका आहे.

 

राजकारणी प्रचारा दरम्यान कश्याप्रकारे मत मिळवून घेतात :-

आज राजकारण हे इतक्या विकोपाला जाताना दिसत आहे की, त्यामुळे अनेक वाईट गोष्टी समाजात घडत आहे. ४२ व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या संविधानात घातला गेला, भारतात अनेक धर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे सर्व धर्मात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रित्या विविधता आढळून येते. परंतु राजकारणी लोक त्याचा गैरवापर करताना दिसत आहे. अमूक अमूक कारणांवरून दंगे उभे केले जाते. दोन पक्षात जातीय दंगली घडवून आणल्या जाते.
राजकीय पुढारी निवडणुकीच्या प्रचार प्रसारा दरम्यान अनेक वाम मार्गाचा अप्रत्यक्षरित्या वापर करताना दिसतात. समाजातील समस्या सोडवणे हे भावी पुढाऱ्यांचे कर्तव्य असते परंतु दारू सारख्या प्राणघातक द्रव्याचा वापर मत मिळवण्यासाठी केला जातो ही खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तसेच पैश्याचे वाटप करून मत मिळवल्या जाते आणि त्यावरून लाजीरवाणी गोष्ट म्हणजेच नागरिक अश्या गोष्टीला बळी पडतात. याचे मुख्य कारण म्हणजेच आपल्या मता ची खरी किंमत काय असते ही भारतीय जनतेला कळलीच नाही.

 

मताची खरी किंमत जनतेला कळलीच नाही :-

भारतात अनेक ठिकाणी असे दिसून येते की मत देण्याची टक्केवारी ही खूपच कमी असते, १०० टक्के मतदान होत नाही. जनतेला वाटते की आपल्या एकट्याचे मताने निवडून येण्यापासून अडवणूक नाही होणार. म्हणून मतच देत नाही. परंतु एका एका मताला खूप किँमत असते हे भारतीय निवडणुकीच्या मागील निकाला नंतर स्पष्ट झाले. पण अजूनही जागृती झालेली दिसत नाही.

 

उदा.

एखाद्या गावात ग्रामपंचायत पदाची निवडणूक होते सासू सुनेला म्हणते मोठी मत द्यायला चालली, तुझ्यामुळे काय निवडून येणाऱ्यांची अडवून होईल का? जे यायचे ते निवडून येतीलच. आज अशा मानसिकतेमुळे च भारत हा विकासापासून वंचित राहिला आहे.

जनतेचे कल्यानात्मक कार्य भविष्यात होईल, अशा उमेदवाराची निवडच केल्या जात नाही आणि याचा आघात हा समाजावर होताना दिसतो. हे पैश्याच्या भरवश्यावर तसेच दारू सारख्या गोष्टींच्या भरवश्यावर निवडून येऊन स्वार्थी वृत्तीने खुर्ची मिळवतात व विकासात्मक कार्य करत नाही.

 

सर्वांना मताचा सारखाच अधिकार:-

गरीब, श्रीमंत, अपंग, तसेच तृतीयपंथी किंवा स्वतः पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा असले, तरी मतदान देण्याराला सारखाच अधिकार आपल्या भारतात आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सर्वांना एका वेळी एकदाच मतदान करण्याचा हक्क आहे. एखादा श्रीमंत आहे म्हणून त्यालाच जास्त मतं देण्याचा अधिकार. असे काहीही नाही.

 

Mangesg bele

मंगेश बेले (यवतमाळ)


Tags: DemocrarcyMangesh beleNational voter dayyavatmalमंगेश बेलेमतदान दिनयवतमाळलोकशाही
Previous Post

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांवर नवीन एस्केलेटर, लिफ्ट सुरू होण्याची अपेक्षा

Next Post

किरीट सोमय्या सरकारी फाइली तपासू शकतात का? नवा वाद! सोमय्या म्हणतात कुणाला भीती?

Next Post
kirit Somaiya

किरीट सोमय्या सरकारी फाइली तपासू शकतात का? नवा वाद! सोमय्या म्हणतात कुणाला भीती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!