Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रस्त्यावरील निराधार, मनोरुग्ण यांना पुन्हा माणसात आणणारी तरुणाईची ‘मानवता’!

April 4, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
मानवता

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

ज्यांचं कुणी नसतं त्यांनाही साथ देण्यासाठी पुढे सरसावणं म्हणजेच खरी मानवता. उल्हासनगरमधील तरुणांची मानवता ही संस्था गरजू बेवारस वृद्ध, मनोरुग्ण यांच्यासेवेसाठी सदैव प्रयत्न करते. अशांची सेवा करुन त्यांना पुन्हा माणसांसारखं जगण्याची संधी मिळवून देते.
रस्त्यावर बेवारस पडलेले वृ्द्ध. कशाचंच भान नसलेले मनोरुग्ण. अपघातात जखमी झालेले गरजू. एक नाही अनेक. कितीही संवेदनशील म्हटलं तरी त्यांची अवस्था पाहून आपल्यातील बहुसंख्य मान वळवून पुढे जातात. मात्र, काही माणसं वेगळीही असतात. मानवता ही संस्था अशा वेगळ्या संवेदनशील माणसांचीच. ते कसलीही तमा न बाळगता सेवाकार्यास वाहून घेतात. निराधारांची सेवा करुन त्यांना पुन्हा माणसांसारखं जगण्याची संधी मिळवून देतात.

निलेश बच्छाव, मयुर कदम, बाळु राणे आणि अनुराग चव्हाण हे चार तरुण त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह मानवताचं कार्य अविरत सुरु राखतात. त्यांच्या सत्कार्यामुळे आता समाजातील इतरही अनेक संवेदनशील माणसं साथ देतात.

 

त्यांनी आजवर अथक, सतत केलेल्या कार्याची माहिती त्यांच्याच शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न…

माणूस मनोरुग्ण कधीच नसतो, त्याला त्याच्या आजुबाजुची परिस्थिती मनोरुग्ण बनवते. काही वर्ष एक महिला रस्त्यावर राहत होती. हळूहळू तिची मानसिक स्थिती बिघडत गेली. ‘मानवता’ने या संस्थेने त्यांच्यावर उपाचार करण्यासाठी प्रयत्न केले पण ती महिला ऐकत नव्हती. त्यांनी शेवटी उपचारासाठी श्रद्धा फाऊंडेशनमध्ये दाखल केले. या महिलेचे उपचार पूर्ण झाल्यावर तिच्या घरचा शोध घेऊन गावी परभणीमध्ये घरच्यांजवळ पाठवण्यात आले.

Manvta 13

 

मानवता संस्था ही कार्यक्रमात उरलेले जेवण गेले ४ वर्ष घेऊन गरजूंपर्यंत पोहचवते आहे. मधल्या काळात कामाचा व्याप वाढल्यामुळे त्यांना जेवण गरजुंपर्यंत पोहोचवणे शक्य नव्हत. मात्र त्यांनी पुन्हा ते सुरु केले आहे. कुणी तरी ते अन्न फेकुन देण्यापेक्षा ते कुणा उपाशी असलेल्या गरजूपर्यंत पोहचवणे या सारखे समाधान आयुष्यात रोज आले पाहिजे याच उद्देशाने ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

Manvta 12

 

रसत्यावर असलेली बेवारस एक स्त्री वय अंदाजे ३५-४० दरम्यान असेल, रात्री बेरात्री रसत्यावर फिरत असे. मिळेल ते खात, मनोरुग्ण असलेल्या या महिलेला उपचारासाठी कर्जतला श्रद्धा फाऊंडेशनमध्ये ॲडमिट करण्यात आले. तिच्या एचआयव्ही आणि यूरिन चाचणी निगेटीव्ह आल्या आहेत.

Manvta 11

 

भिक मागता मागता दिवस ढकलत एक काका कसेबसे जगत होते. पायाच्या जखमेमुळे त्यांना चालणे त्रासदायक झाले होते. भान न राहिल्याने ते अस्वच्छ राहू लागले. त्यांच्या शरीराला दुर्गंधी येत असल्याने त्या काकांबद्दल तक्रार आली. तिकडे जाऊन त्यांना उचलून, एका स्वच्छ जागेवर आणून, दाढी-केस कापणे, अंग घासून त्यांना तयार करुन रुग्णालयात रात्री ३ वाजता ॲडमिट केले. सकाळी त्यांच्यावर उपचार केले. साखर असल्यामुळे विशिष्ट काळजी घेणे, जेवण देण्यात येत आहे.

Manvta 8

 

मानवतेच्या कार्यकर्त्यांना एकदा एक फोन आला होता की एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत एकाच जागी पडून आहे. तिकडे गेल्यावर समजले की ती व्यक्ती कायम बाहेरच फिरत असते आणि रस्त्याच्या बाजूला झोपते. गेले काही दिवस अशक्तपणामुळे एकाच जागी पडून आहे. मानवता संस्था तिथे गेल्यावर त्यांनी या व्यक्तीला ग्लुकोजचे पाणी पाजले, तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणले. पण एकाच जागी पडून असल्यामुळे शरीर पूर्ण घाण झाले होते. त्याचे केस दाढी कापून गरम पाण्याने आंघोळ घालून चांगले कपडे घातले. पण त्यांना काही शारीरिक आजार नसल्यामुळे रुग्णालयात घेऊन जाण्यात काही अर्थ नव्हता. आणि ते आश्रमामध्ये यायला तयार नव्हते. म्हणून ते पुन्हा रस्त्यावर वरच राहिले. अर्थात बदललेल्या अवस्थेत.

Mamvta 6

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

उल्हासनगरमध्ये गोल मैदान जवळच्या बस स्टॉप जवळ एक काका बेवारस स्थितीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पडून होते. तिकडे गेल्यावर त्यांना पाणी आणि ORS पाजत त्यांच्या घराबद्दल चौकशी केली. नातेवाईकांची माहिती मिळाली. त्यांना आंघोळ घालून चांगले कपडे घालून तात्पुरत्या आश्रयासाठी त्यांना आश्रममध्ये ठेवण्यात आले. या काकांच्या घरासाठी मानवता या संस्थेने आपल्या फेसबुक पोस्टवर त्यांची पोस्ट टाकली होती आणि फेसबुक चा माध्यमातून २ दिवसातच त्यांचे घर मिळाले. त्यांना घरी पोहचवण्यात आले.

Manvta 5

 

रस्त्यावरच्या लोकांसाठी सेवाकार्य करताना वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासत असत. त्यातूनच मानवता संस्थेसाठी आपलं हक्काचे स्वत:चे जनाई रुग्णालय सुरु करण्यात आले. सामान्य जनतेसाठी सुद्धा २४ तास चालू असे हे रुग्णालय आहे. रुग्णांजवळ पैसा नसल्याने खासगी रुग्णालय ज्यांना सेवा नाकारतात, अशांसाठी या रुग्णालयात २४ तासात कधीही उपचारासाठी येऊ शकतात. रस्त्यावरच्या लोकांना रुग्णालयात आणून त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार केले जातात. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये असलेल्या जनाई रुग्णालयात डॉ. संतोष सदावर्ते, सोनाली कदम हे व्यवस्था पाहतात. तेथे सेवा पॅथोलॉजी लॅबही आहे.

 

उल्हासनगर 2 मध्ये एक काका बेवारस स्थितीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पडून होते.तिकडे गेल्यावर घराबद्दल चौकशी केली असता ते काका देवगड तालुक्यातील महाळुंगे या गावचे व त्यांचे नाव सुयश राणे आहे.
कोणी ओळखत असल्यास कृपया कळवावे
Ramchandra Rane -९६९९४४१२७६
निलेश बच्छाव-८१०८५५०२३६ pic.twitter.com/5kqUG4Zi4V

— harshu🐼 (@nav_me22) March 27, 2022

ही काही उदाहरणे फक्त या वर्षाच्या गेल्या तीन महिन्यांमधील सेवाकार्यातील आहे. या निवडक कार्यांपेक्षाही कित्येक पट जास्त काम या संस्थेने केली आहे. ही संस्था करत असते.

 

जर तुमच्या पण नजरेत असे रस्त्यावरील बेवारस मनोरुग्ण असतील तर नक्की फोन करा. त्यांना बरं करुन त्यांचे राहते घर शोधण्याचा प्रयत्न मानवता संस्था नक्कीच करेल.

 

निलेश बच्छाव-8108560236
मयुर कदम-8483867843
बाळु राणे-9699441276
अनुराग चव्हाण- +918788244574

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Anurag ChavanBalu Ranegood newsHumanitarian InstitutionsmanavtaMayur KadammuktpeethNilesh BachhavPsychiatricअनुराग चव्हाणचांगली बातमीनिलेश बच्छावबाळु राणेमनोरुग्णमयुर कदममानवतामानवता संस्थामुक्तपीठ
Previous Post

राज्यात ११७ नवे रुग्ण, १३१ रुग्ण बरे! मुंबई ३५, नाशिकमध्ये एकही नवा रुग्ण नाही!!

Next Post

टपाल विभागाची स्पर्धा: पत्र लिहा आणि बक्षीस मिळवा!

Next Post
india post

टपाल विभागाची स्पर्धा: पत्र लिहा आणि बक्षीस मिळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!