मुक्तपीठ टीम
आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव आहे. देशातील सर्व शिवमंदिरात हा सोहळा साजरा होत असतो. यावेळी भोलेनाथ यांची नगरी वाराणसीमध्ये हा उत्सव उत्सवात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण भोलेनाथांच्या सासुरवाडीची सुरस कथा जाणून घेणार आहोत. काशीपासून जवळ असलेल्या सारनाथ येथे हे एकमेव मंदिर असून ते सारंगनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मेहुणा सारंगयाच्या बरोबर स्वतः भोलेनाथही विराजमान आहेत.
वाराणसी-छपरा रेल्वे स्थानकावर सारनाथ रेल्वे स्थानकाजवळ स्थित मंदिरात भगवान शिवाचे मेहुणे सारंग ऋषी आणि बाबा विश्वनाथ यांनी एकत्र दर्शन मिळते. काही लोक सारनाथला भगवान शंकराचे सासरही म्हणतात. दोन शिवलिंग असलेला हे शिवमंदिर उत्तर भारतातील एकमेव शिवमंदिर असल्याचा दावा येथील लोक करतात. श्रावण आणि महाशिवरात्री उत्सवानिमित्त येथे शिवभक्तांची मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीनिमित्त सारंगनाथ मंदिरात जत्रेसारखे वातावरण असते. भगवान शिव आणि त्यांचे मेहुणे सारंगनाथ दोघेही येथे विराजमान आहेत.
या मंदिराचा इतिहास-
- मह्देवांचा विवाह दक्ष राजाची मुलगी सती हिच्याबरोबर झाला तेव्हा तिचा भाऊ ऋषी सारंग उपस्थित नव्हता.
- आपल्या बहिणीचा विवाह एका भणंगाबरोबर झाल्याने तो नाराज होता.
- कपडा नाही, दागिने नाहीत असल्या गरिबाला बहिण दिल्याने तो दागदागिने, कपडालत्ता घेऊन बहिणीकडे निघाला व वाराणसी बाहेर सारनाथ येथे त्याने मुक्काम केला.
- रात्री स्वप्नात त्याला वाराणसी नगरी सोन्याची असल्याचे दिसले.
- जागा झाल्यावरही तेच दृश्य दिसले तेव्हा त्याला पश्चाताप झाला व तो तेथेच तपश्चर्येला बसला.
- हजारो वर्षाच्या तपानंतर त्याला महादेव प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितले.
- तेव्हा सारंगने तुम्ही माझ्यासोबत राहा असा वर मागितला.
- यानंतर येथे दोन स्वयंभू शिवलिंगे तयार झाली.
- त्यातील एक सारंगनाथ व दुसरे सोमनाथ म्हणून पूजले जाऊ लागले.
- सारंगनाथाची पिंड लांबीला अधिक आहे तर महादेवाची पिंड उंचीला अधिक आहे.
- २४०० वर्षापूवी बौद्ध धर्माचा प्रसार वाढू लागला तेव्हा आदि शंकराचार्यांनी येहते बौद्ध गुरूंशी वादविवाद करून त्यांना हरविले आणि शिवलिंगे स्थापन केली.
भाविकांची श्रद्धा
- या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
- येथे लग्नानंतर लगेच दर्शन घेतले तर सासर माहेरातील संबंध चांगले राहतात असे मानले जाते.
- तसेच मेहुण्याबरोबर नाते मधुर होते.
- येथे दर्शन केल्यावर त्वचा रोग बरे होतात.
- अतिव्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णाने या तलावात आंघोळ केली तर तो व्यक्ती रोगमुक्त होतो.
- ४१ सोमवार दर्शन केले तर सोन्या संबंधातील इच्छा पूर्ण होतात असाही समज आहे.